मुंबई : महान्यूज लाईव्ह अर्णव गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास परवानगी द्यावी यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला. परंतु कोरोना संसर्गाच्या कारणास्तव त्यांना भेटता येणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या पदरी निराशा आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधत तुरुंगात असलेल्या अर्णव गोस्वामी यांना कुटुंबीयांशी भेटण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती. परंतु सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच तुरुंगांमध्ये नातेवाईकांना भेटी घेण्यास मनाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीस नकार दिला आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय अर्णव यांच्याशी दूरध्वनीवरून बोलू शकतील असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. भाजप नेत्यांनी या प्रकरणात जास्तच रस दाखवला असल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच तुरुंगात ज्या पद्धतीने खबरदारी घेऊन वकील अथवा नातेवाईकांना भेटण्यास ...