बारामती : महान्यूज लाईव्ह
महायुतीच्या समन्वयासाठी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामतीत महायुतीतील घटक पक्षांसह सर्वांची बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी सांगीतपणे काम करायचा आहे असं सांगत असतानाच त्यांनी कोणीही निगेटिव्ह बोलायचं नाही अशी तंबीच दिली त्याचबरोबर ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे त्यांनी आत्ताच पक्ष सोडावा अशा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
चंद्रकांतदादा पाटील यांनी अशा पद्धतीने हजेरी घेतल्याने निष्ठावंत कार्यकर्ते ही हिरमुसले होते. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी बांधिलकी आणि संगीत भावना यावरच पक्ष चालतो, बाकी काही देणे-घेणे नाही. ज्यांना विरोधकांचे काम करायचे आहे, त्यांनी आधी पक्ष सोडावा. त्यांचं काम करावं.
अर्थात त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही, सरकारच्या योजना घ्यायच्या आणि नंतर वेळ येईल त्यावेळी मनासारखे वागायचे. असले खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, रूपाली चाकणकर, पृथ्वीराज जाचक, वैशाली नागवडे, जालिंदर कामठे, नवनाथ पडळकर, बाळासाहेब गावडे, पांडुरंग कचरे, दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले, त्यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्याला एका बुथवर किमान 370 मतांची गरज आहे. ही 370 मते महायुतीला मिळालीच पाहिजेत, यासाठी काम करा. शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना शब्द दिला होता, मात्र ऐनवेळी माघार घेत त्यांनी नरेंद्र मोदींचा अपमान केला आहे. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्हाला काम करायचे आहे. त्यामुळेच घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला विजयी करायचे आहे.











