• Contact us
  • About us
Tuesday, September 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परमबीरसिंह अखेर निलंबित ! राज्य सरकारने अखेर दिला दणका !

Maha News Live by Maha News Live
December 2, 2021
in सामाजिक, आरोग्य, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह आज अखेर निलबिंत झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निलंबनाच्या फाईलवर सही केली असून निलंबनाचा आदेश आजच निघण्याची शक्यता आहे. परमबीरसिंह हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गायब होते. ते २५ नोव्हेंबरला मुंबईला परतले आहेत. राज्य सरकार जणू त्यांची परतण्याचीच वाट पहात होते. त्यामुळे ते येताच लगेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सध्याच्या काळातील चर्चेत असलेले नाव म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह. रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणाने सुरवात झालेल्या या सगळ्या प्रकरणाने आता इतकी वळणे घेतली आहेत, याचा मुळ धागा कुठे आहे हे या सगळ्या गुंतागुंतीत लोक विसरून गेले आहेत. लोक हेदेखील विसरून गेले आहेत की याच परमबीरसिंहांसाठी राज्य सरकार आणि गृहमंत्री केंद्रसरकारशी भांडत होते. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाच्या वेळी हेच परमबीरसिंह राज्यसरकारचे फारच लाडके बनले होते. पण मुकेश अंबानीच्या घरासमोर ठेवलेला बनावट बॉम्ब जणू राज्यसरकारवरच फुटला.

यानंतर असे सुरस आणि चमत्कारिक घटनांचे सत्य समोर आले, ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती. सचीन वाझे या पोलिस अधिकाऱ्यानेच मनसुख हिरेन या माणसाच्या मदतीने हा बॉम्बचा बनाव केला होता, या प्रकरणाचा तपसाही सुरुवातीला वाझेंकडेच होता, आणि त्यावेळेस गृहमंत्री अनील देशमुख वाझेंची विधानसभेत पाठराखण करत होते. पण हळूहळू या प्रकरणाचे गांभिर्य वाढत गेले. मनसुख हिरेन गायब झाला, त्यानंतर त्याचे प्रेत सापडले, आणखी अखेर त्याचा खून झाला असून तो सचीन वाझेंनीच आपल्या पोलिस सहकाऱ्यांच्या मदतीने केला असल्याचे उघडकीस आले. सचीन वाझेंसारख्या माणसावर विश्वास ठेवण्याची किंमत मनसुख हिरेन याला आपला जीव गमावून द्यावी लागली. हे सगळे घडल्यावर सचीन वाझेंना अर्थातच जावे लागले. या सगळ्याचा जबाबदार म्हणून त्यांचे वरिष्ठ अधिकारी परमबीरसिंह यांची बदली करण्यात आली.

या बदलीमुळे परमबीरसिंह इतके दुखावले गेले की, त्यांनी एक लेटरबॉम्ब फोडला. हा या प्रकरणातील दुसरा बॉम्ब.

या लेटरमध्ये त्यांनी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर आरोप केले. सचीन वाझेला प्रोत्साहन देण्यासाठी गृहमंत्र्यांना जबाबदार धरले. दरमहिना १०० कोटीची वसुली मुंबईतील बारचालकांकडून करण्याची जबाबदारी सचीन वाझेंवर सोपविण्यात आल्याचेही या पत्रात त्यांनी म्हणले. हे पत्र त्यांनी प्रथम मिडियात प्रसिद्ध केले आणि नंतर प्रत्यक्षात पाठवले. या लेटरबॉम्बचा दणका इतका मोठा होता की, गृहमंत्र्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. केंद्रसरकारला अर्थातच संधी मिळाली, आणि केंद्रीय तपास यंत्रणा या विषयाच्या मागे लागल्या. यानंतर ” काचेचे घर असलेल्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नयेत ” या म्हणीचा पुरेपूर अनुभव परमबीरसिंह यांना आला. पोलीस अधिकारी म्हणून त्यांनीही अनेक उद्योग केले होते. ते आता पुढे येऊ लागले, त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ लागले. त्यानंतर अशी वेळ आली की ते मुंबईतून गायब झाले. याच वेळेस केंद्रीय यंत्रणा अनील देशमुखांना चौकशीसाठी बोलावत होत्या, पण ते हजर राहत नव्हते.

महाराष्ट्राच्या जनतेने असेही दिवस पाहिले की राज्याचे माजी गृहमंत्री आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दोघेही अनेक दिवस गायब आहेत, म्हणजेच कायद्याच्या भाषेत ” फरार ” होते.

कथा मोठी रोचक आहे, अखेर एक दिवस माजी गृहमंत्री चौकशीसाठी हजर झाले आणि जसे अपेक्षित होते तशी त्यांना अटक झाली. त्यानंतर काहीच दिवसात इतके दिवस गायब असलेले परमबीरसिंह मुंबईत परत आले. त्याअगोदर त्यांनी न्यायालयातुन अटकेपासून संरक्षण मिळवले होते.

यानंतर एक दिवस या कथेतील तीन महत्वाची काल परवा पुन्हा एकत्र आली. राज्यसरकारने नेमलेल्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी आलेले सचीन वाझे आणि परमजीतसिंह यांनी तासभर एकमेकांशी गप्पा केल्या. दुसऱ्या दिवशी माजी गृहमंत्री अनील देशमुख आणि सचीन वाझे दहा मिनिटे एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान परमबीरसिंहांनी स्वत:च फोडलेल्या लेटरबॉम्बची वात काढण्याचा प्रयत्न करीत आपण केलेले आरोप हे ऐकीव आहेत, आपल्याकडे काहीच पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र दिले. दुसरीकडे सचीन वाझेही १०० कोटी वसुलीच्या आरोपांपासून चौकशी आयोगासमोर लांब पळताना दिसले.

आता हे प्रकरण हळूहळू शांत होत जाईल असे वाटत होते. पण आज राज्यसरकारने परमबीरसिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करत पुन्हा एकदा यामध्ये रंग भरले.

आता खरे काय आणि खोटे काय ? मुकेश अंबानीच्या घरासमोर ठेवलेला बॉम्ब का १०० कोटी वसुलीचे आदेश ? यातले सत्य आपल्याला कधी कळेल असे वाटत नाही. पण या सगळ्या खेळात बळी गेलेला मनसुख हिरेन मात्र आज सगळ्यांच्या आठवणीतही राहिलेला नाही. वाझेसाहेबांवर माझा विश्वास आहे, ते मला या प्रकरणातून बाहेर काढतील असे आपल्या भावाला फोनवर सांगणाऱ्या मनसुखला भेटीसाठी बोलावून सचीन वाझेंनी कसे मारले याची कहाणी आज कोणाला आठवणार नाही. या कामात वाझेंच्या दहशतीमुळे सामील झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचे ” काही वेळेस आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याच्याच विश्वासघात करावा लागतो ” हे व्टिट देखील लोक केव्हाच विसरून गेले असतील.

पण अजूनही गोष्ट संपलेली नाही.

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त

Next Post

अवकाळीच्या थंडीत गारठून ५६ मेंढ्यांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group