महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना दणका देत तब्बल १७६ तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्या आहेत. महसूल विभागाच्या या सर्व बदल्या उध्दव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.
बाळासााहेब थोरात यांनी बदल्यांची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. या फाईलला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्यानंतर बदल्यांचा आदेश मोकळा झाला. या बदल्या विनंती बदल्या असल्या तरीदेखील या बदल्या करताना जे अधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भाजपच्या मर्जीतील अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांना प्राधान्याने बदलले. हे अधिकारी अजूनही भाजपच्या त्या भागातील माजी आमदार, आमदार, खासदारांसाठीच प्राधान्याने काम करीत होते. जनतेची व सरकारी कामांपेक्षा त्यांना ही मर्जी सांभाळण्यातच त्यांचा वेळ जात होता. या अधिकाऱ्यांना दणका देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. या अधिकाऱ्यांची अजून तीन वर्षे पूर्ण व्हायची होती.











