• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका मुलाला तरी कुठे ना कुठेतरी नोकरी मिळावी याची खबरदारी घेतली पाहिजे,तरच शेती ही फायद्याची होईल -शरद पवार

tdadmin by tdadmin
January 18, 2024
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका मुलाला तरी कुठे ना कुठेतरी नोकरी मिळावी याची खबरदारी घेतली पाहिजे,तरच शेती ही फायद्याची होईल -शरद पवार

पिकवणारा हा जर कर्जबाजारी झाला,तो संकटात गेला तर खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित कृषिक २०२४ याचे उद्धघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कर्नाटकचे कृषीमंत्री एन. चेलूवरायस्वामी, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठचे डॉ. अजित जावकर, ॲग्री पायलट ची डायरेक्टर संचालक डॉ. प्रशांत मिश्रा, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, दिल्लीमध्ये कधी-कधी पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारच्या माणसांबरोबर मला चर्चा करण्याची संधी मिळते. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न हा मी उपस्थित केल्यानंतर मला बोलतात, काहीही सांगतात, तुम्ही पिकवणारे आम्ही खाणारे असं सांगून मूळ प्रश्न बाजूला करतात. अर्थात या देशात पिकवणारे किती आणि खाणारे किती, याचा जर अंदाज घेतला,तर पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि मी सांगत होतो की, पिकवणारा जर कर्जबाजारी झाला, तो संकटात गेला तर खाणाऱ्यांना उपाशी राहावे लागेल.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, शेतीवरचा बोजा हा वाढलेला आहे. मी नेहमी सांगत असतो की,हा वाढलेला बोजा आपल्याला कमी करायला हवा, देश स्वतंत्र झाला, तेव्हा ३५ कोटी लोकसंख्या होती, तेव्हा ८०% लोक हे शेतीवर अवलंबून होते. आज ५६% लोक शेतीवर अवलंबून आहेत, परंतु तितकी जागा राहिलेली नाही. एमआयडीसी, रस्ते हायवे, धरणे, नवी मुंबई सारखे शहर यांसारख्या अनेक योजनांमुळे शेतीची जमीन नाहीशी झाली.

तरीही शेतीवर जवळपास आज ३० पट लोक अवलंबून आहेत. त्यामुळे शेतीच्या संदर्भात वेगळा दृष्टिकोन केला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका मुलाला तरी कुठे ना कुठेतरी नोकरी मिळावी याची खबरदारी घेतली पाहिजे, तरच शेती ही फायद्याची होईल आणि शेती फायद्याची होण्यासाठी जशी धोरणे महत्त्वाची आहेत, तसेच संशोधन, नवीन घेतलेला शोध तो शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

कृषिक सारखी प्रदर्शने यासाठी महत्त्वाची आहेत. तुम्ही पुढच्या ४-५ दिवसांमध्ये जे पाहाल, जे काही नवीन बदल होत आहेत, ते जाणून घ्याल आणि ते तुमच्या शेतीमध्ये आणून तुमची सापत्तीक शेती ही सुधारण्यासाठी काम कराल अशाच प्रकारची अपेक्षा आहे. मला आठवतंय, त्या काळामध्ये मी मंत्री होतो आणि माझ्याकडे अन्न पुरवठा खाते होतं आणि त्या वेळेला दुष्काळ पडला, धान्य परदेशातून आले आणि ते धान्य ज्वारीच्या ठिकाणी मिलो होतं आणि त्या मिलोची लाल भाकरी मला माहिती नाही, तुमच्यापैकी कोणी पाहिली का? ती भाकरी खायचा प्रसंग केवळ उत्पन्न घटलं आणि दुष्काळ पडला म्हणून या देशांमध्ये आलेला होता आणि ती स्थिती येऊन द्यायची नसेल तर, शेतकऱ्याचे उत्पादन, त्याची उत्पादन क्षमता,त्याच्या उत्पादनाची किंमत यावर भर द्यावा लागेल.

एक आंदोलन झाले. मी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांकडे गेलो होतो, कांद्याच्या किमती ढासळल्या, त्याचा उत्पादन खर्च देखील निघत नव्हता; फक्त परदेशात कांदा पाठवला, तर किंमत मिळत होती, पण केंद्र सरकारने परदेशामध्ये कांदा पाठवायला ४०% ड्युटी बसवली. मी शेती खात्याचा केंद्रात मंत्री होतो, कांद्याच्या किमती वाढल्या होत्या; पार्लमेंटचे हाऊस सुरू झाले आणि विरोधी पक्षाचे, भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि घोषणा सुरू केल्या की, शरद पवार इस्तीफ़ा दो । स्पीकरने विचारलं काय आहे ? कशासाठी या घोषणाबाजी चालू आहेत? तर विरोधकांनी सांगितलं की, कांद्याच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याला जबाबदार कृषिमंत्री आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत.

मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खुलासा करा,मी त्यांना सांगितलं की, रोजच्या खाण्यामध्ये तुमचा कांद्याचा खर्च किती आहे? तांदूळ, डाळी, ज्वारी, तेल, तिखट या सर्वांचा खर्च असेल,परंतु यात कांद्याचा किती खर्च आहे? एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही,तर माणूस उपाशी राहिला असे होत नाही. पण हा कांदा उत्पादक शेतकरी गरीब आहे आणि या गरीब शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत असतील, तर लगेचच किमती थांबवण्यासाठी बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही. तुम्ही कांद्याच्या माळा घाला, नाहीतर काहीही करा, मी कांद्याची किंमत खाली येऊ देणार नाही, मी त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काहीही सहन करायला तयार आहे, शेवटी सर्वजण गप्प बसले आणि त्यांनी मान्य केले.

Next Post
आमदारसाहेब तुम्ही कोट्यवधींचा विकास निधी आणताय पण ठेकेदार कामे निकृष्ट करतायत! थोडं लक्ष घालावे ही नागरिकांची मागणी!

आमदारसाहेब तुम्ही कोट्यवधींचा विकास निधी आणताय पण ठेकेदार कामे निकृष्ट करतायत! थोडं लक्ष घालावे ही नागरिकांची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group