बारामती : महान्यूज लाईव्ह
पूर्वी पत्र करीत आहे सुसंस्कृती निष्पक्ष होती पत्रकारिता ही एक फॅशन होती पण काळानुसार यात खोदलेला बदल दुर्दैवी आहे, जसजसा भांडवलदार वर्ग पैशाच्या मोहात आपली माध्यमे पणाला लावू लागला आणि त्याला पत्रकार व्यावसायिकतेची जोड देऊ लागला तसतशी पत्रकारिता बदनाम झाली आणि पत्रकारीतेची अधोगती झाली.
व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनामध्ये आयोजित परिसंवादात पत्रकारिता बदनाम होण्यामागील कारणे व त्यावरील उपाय या विषयावर मा सूर होता. पत्रकार सुनील कुहीकर, दुर्गेश सोनार व रवी आमले मत व्यक्त करत होते. फरहा खान यांच्या सूत्रसंचालनामध्ये हा कार्यक्रम झाला.
दुर्गेश सोनार म्हणाले, पत्रकारितेत व्यवसाय एवढा शिरला की आता पत्रकारांची अवस्था काही बोलायचे आहे पण बोलणार नाही अशी झाली आहे एकीकडे नोकरी जाण्याची भीती, दुसरीकडे अस्वस्थता आणि तिसरीकडे अजेंडा आणि मालकाची भीती त्याला अशा गोष्टी करायला भाग पाडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सुनील कुहीकर म्हणाले, की काळ किती बदलला आणि पत्रकारिता बदलली तरी देखील शिक्षक आणि पत्रकारांना समाज भान असले पाहिजे. त्यांना काळानुसार बदलून चालणार नाही, मात्र पूर्वीसारखी विचारधारा धरून राहणारी पत्रकारिता उरलीच नाही. राजकीय वर चष्मा अजेंडा निंदगिरी यामुळे पत्रकारिता हा फक्त नोकरीचा विषय राहिला आहे.
रवी आमले म्हणाले की, टीव्हीवरून समाजात अवतीभवती जे घडते, ते दाखवण्यापेक्षा अजेंडा ठरवून कार्यक्रम सेट केले जातात त्यामुळेच पत्रकारितेच्या अधोगतीमध्ये वाढ झाली आहे. आपण जे दाखवतो त्याचे अनुकरण समाज करत असतो, याचे महत्त्वाचे भान आपल्याकडेच राहिलेले नाही.











