विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
सोमेश्वरनगर : वाघळवाडी ग्रामस्थांच्या वतीने बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी उत्तम धुमाळ यांची तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ३३५० उच्चांकी दर दिल्याबद्दल वाघळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, उद्योजक आर एन शिंदे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, निरेचे उपसरपंच राजेश काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शैलेश रासकर, ऋषी गायकवाड, लक्ष्मण गोफणे व संचालक, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सतीश सकुंडे, वाघळवाडी गावचे सरपंच, उपसरपंच गणेश जाधव, तुषार सकुंडे, निशा सावंत, आनंदराव सावंत, गुलाब गायकवाड, विकास सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सावंत होते.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी बोलताना सांगितले की, सन १९८९ साली मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. तेव्हापासून म्हणजे गेल्या ३५ वर्षांपासून वाघळवाडी आणि माझा त्या ठिकाणी जिव्हाळ्याचा संबंध आहे. तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये काम केले, आदर्श निर्माण केला. महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच कारखान्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा नंबर लागतो. ऊसदराच्या बाबतीत किंवा पहिल्या हप्त्याच्या बाबतीत असेल, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हाच पहिल्यांदा उसाची कोंडी त्या ठिकाणी फोडत असतो. अत्यंत सुस्थितीत कारखाना असल्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चांगला ऊसदर देत असल्याचे होळकर म्हणाले.
पुढे बोलताना संभाजी होळकर म्हणाले, माळेगावच्या परिसरामध्ये आपल्याला सगळ्यांना वाटायचं की, त्या ठिकाणी कारखान्याचे शैक्षणिक संकुल आहे आणि आपल्यालाही या ठिकाणी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं अभियांत्रिकीच शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून आपली तळमळ होती, मात्र आपल्या कारखान्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण केली. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळवून एक आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी आधार झाला. कारखान्याचे शैक्षणिक संकुल सुद्धा महत्त्वाचं असतं आणि ते आज आपल्या कारखान्याने फार मोठ्या प्रकारचं त्याच्यामध्ये योगदान दिलेल आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शैक्षणिक संकुल असल्यामुळे आपली प्रगती झाली आणि ह्या परिसराचा आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला. मग पक्षाच्या माध्यमातून जे काही संघटनेचे काम असेल, वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भातलं काम असेल, आपल्या जनतेची त्या संदर्भातली काम असतील विकासाची काम असतील, ज्या सूचना असतील त्या उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असतो.
गेल्या आठवड्यामध्ये जवळपास बारामती तालुक्याचे २०० कोटीचा विकास निधी उपलब्ध झाला, तो केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मिळाला. आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे, आपल्या अजून विकासकामांना त्या ठिकाणी गती मिळाले पाहिजे, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित या सरकारमध्ये सामील होऊन खऱ्या अर्थाने आपल्या जनतेचे अडचणी सोडवल्या पाहिजेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाच्या मुद्द्यावर ह्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत.आणि म्हणून त्याचा फायदा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला मिळतो. सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली काम होत आहेत. मध्यंतरी एक वर्ष गेलं, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की, आपली जी काम होती. त्याच्यामध्ये कसा खंड त्याठिकाणी पडला होता असे संभाजी होळकर म्हणाले. दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने विजय सावंत व सतीश सकुंडे यांनी आभार मानले.











