भुवनेश्वर : महान्यूज लाईव्ह
उडीसाच्या बालासोर मध्ये कोरोमंडल एक्सप्रेस आणि बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस चा झालेल्या अपघातात तब्बल 288 जणांचा मृत्यू झाला आहे आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार नऊशेहून अधिक प्रवासी जखमी आहेत. त्यातीलही काही प्रवासी अजूनही गंभीर आहेत.
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं कारण रेल्वेने नमूद केला असून, एकापाठोपाठ एक तीन रेल्वे एकमेकांना धडकल्याने हा गंभीर आणि भीषण अपघात घडला.
कोरोमंडल एक्सप्रेस चा वेग तब्बल 130 किलोमीटर प्रति तास असा होता. या रेल्वेच्या चालकाला बहनगा बाजार या ठिकाणी हिरवा सिग्नल मिळाला. ही रेल्वे वेगात असल्याने काही घडण्यापूर्वीच मेन लाईन वर जाण्याऐवजी लूक लाईन वर गेली आणि या लाईनवर मालगाडीला कोरोमंडल एक्सप्रेस ने जोरदार धडक दिली.
ही धडक बसल्याबरोबर तब्बल २१ डबे रुळावरून घसरले. काही डबे मालगाडीवर चढले, तर काही डबे मेन लाईनच्या दिशेने गेले आणि त्याचवेळी मेन लाईन वरून बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस येत होती. या एक्सप्रेसने या डब्यांना धडक दिली आणि अशा रीतीने तब्बल तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या.