मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात 25 ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा करून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. (#school#opening# Maharashtra #govt #rajesh #tope)
टोपे आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार हा विभाग कुलगुरूंच्या संपर्कात आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात त्यात या विद्यापीठाचे कुलगुरू त्यांचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील आणि या सर्व प्रक्रियेसाठी साधारणपणे पाच ते सहा दिवस लागतील. या मध्ये शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
दरम्यान राज्यामध्ये डेल्टा व्हेरीएंट चे रुग्ण आढळत असले तरी, त्यांची लक्षणे सौम्य आहेत. मात्र या विषाणूमध्ये संक्रमण अधिक करण्याची क्षमता आहे. केंद्राकडून लस उपलब्ध होत नसल्याने जास्तीत जास्त लसीकरण होत नाही. मात्र लसीकरणाची राज्याची यंत्रणा किती सक्षम आहे, हे 14 ऑगस्ट रोजी ज्या पद्धतीने विक्रमी लसीकरण झाले, तिथेच स्पष्ट झाले आहे असे टोपे म्हणाले.