मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गोवा यादरम्यानच्या मार्गात रविवारी बोट अपघातात 13 जणांचा जीव गेला. 13 जणांमध्ये ते कुटुंब ही दुर्दैवी होतं की, जे उपचारासाठी मुंबईला आले होते आणि सहज समुद्रसपारी करायची म्हणून निघाले होते. त्यांची ही समुद्र सफारी आणि त्यांचे उपचार शेवटचे ठरले.
नीलकमल बोट आणि नौदलाच्या स्पीड बोटीमध्ये झालेल्या अपघातात तब्बल 13 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत च्या आहेर कुटुंबाचा ही समावेश होता. या घटनेमध्ये मिथू राकेश आहेर या चिमुकल्यासह राकेश आहेर आणि त्यांची पत्नी या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
दम्याच्या उपचारासाठी राकेश आहेर पत्नी आणि मुलासह मुंबईला आले होते. यादरम्यान आलोच आहोत मुंबईला; तर एलिफंटा गुहा पाहून येऊ असे म्हणत गेटवे ऑफ इंडिया मध्ये येऊन त्यांनी समुद्रसपारीसाठी तिकीट काढले. हे तिकीट त्यांच्या आयुष्याचे शेवटचे तिकीट होते. बोटीत खचाखच पर्यटक भरले. बोट निघाली तेव्हा सगळेच आनंदात होते. समुद्राच्या लाटांबरोबर त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते.
आता एलिफंटा गुहा काही अंतरावरच होती, मात्र तेवढ्यात दुपारी चारच्या दरम्यान अचानक नौदलाची एक स्पीड पोस्ट बोट काळ बनून या नीलकमल बोटीकडे वेगाने आली. ती एवढ्या वेगाने आली आणि धाडदिशी धडकली. काही करायच्या आत सारा हलकल्लोळ झाला. त्या नौदलाच्या बोटीवरही तिघेजण गेले आणि नीलकमल बोटीतील दहा जणांना जीव गमावला. नौदलाच्या वेगवान बोटीचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. पण कर्मचाऱ्यांनी स्टंटबाजी केली असा आरोप देखील या घटनेतून वाचलेल्या व प्रत्यक्षदर्शी असलेल्या पर्यटकांनी केला आहे.











