• Contact us
  • About us
Monday, September 14, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरणच्या तारांमधून ठिणग्या; दोन एकर ऊस जळून खाक! शेतकऱ्याला अश्रू अनावर!

mahaanewslive by mahaanewslive
September 12, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
साखर कारखान्यांच्या गाळपाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात; राज्य सरकारचा निर्णय

२५ सप्टेंबरपर्यंत कार्यवाहीचा अल्टिमेटम; अन्यथा महावितरण कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशारा

निंबूत-बारामती : मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या दोन एकर उसाची महावितरणच्या विद्युत तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे राखरांगोळी झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. पुरंदर आणि बारामती तालुक्यांच्या सीमेवरील कोळेवस्ती परिसरात घडलेल्या या घटनेने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, डोळ्यांसमोर उभे पीक जळताना पाहून संबंधित शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

या दोन एकर ऊसासाठी आतापर्यंत तब्बल दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. कष्टाने आणि मोठ्या अपेक्षेने उभ्या केलेल्या पिकाची एका क्षणात राख झाल्याने त्याच्यावर मोठे संकट ओढवले आहे. “आयुष्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली. एवढ्या कष्टाने उभा केलेला ऊस डोळ्यांसमोर जळून खाक झाला,” अशी व्यथा शेतकऱ्याने व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच सोमेश्वर कारखान्याचे संचालक घटनास्थळी दाखल झाले आणि जळीत क्षेत्राची पाहणी केली. मात्र सध्या कारखाना बंद असल्याने जळालेला ऊस कारखान्यात नेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पर्यायी मार्गाने दिलासा मिळावा आणि जळालेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांबाबत महावितरणला यापूर्वीच अनेकदा सूचना करण्यात आल्याचे सोमेश्वर कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र विद्युत तारांबाबत योग्य ती दुरुस्ती किंवा आवश्यक उपाययोजना वेळेत न झाल्याने अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लाखो रुपये खर्च करून शेतकरी पीक उभं करतो. मात्र अशा प्रकारे काही क्षणांत त्याची राखरांगोळी होते. मग शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागायची? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या घटनेनंतर महावितरणने शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच २५ सप्टेंबरपर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दोन एकर ऊस जळून मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीची भरपाई कोण देणार? विद्युत तारांमधून ठिणग्या पडण्यास कारणीभूत परिस्थितीची जबाबदारी कोणाची? तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणकडून ठोस उपाययोजना कधी होणार? याकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group