किरण माने, अभिनेता
अंधभक्तांनो, तुमच्या सडक्या नासक्या मेंदूत कोरून ठेवा…कुणी गणपतीत डॉल्बी बंद करा म्हणालं, म्हणजे त्याचं बकरी ईदला समर्थन आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ‘लवणेनं भोज्यम्’ आहात.…कुणी आपल्या अंधश्रद्धांवर बोललं, म्हणजे तो मुस्लिमांच्या अंधश्रद्धा झाकून ठेवतो असा बालीशपणा तुम्हाला सुचत असेल तर तुमच्या विचारांत ‘गटर का गॅस’ भरलेला आहे.
हो, आणि एक लक्षात ठेवा…माणसामाणसात उच्चनीच ठरवणार्या, स्त्रियांचं पायपुसणं करणार्या अत्यंत किळसवाण्या अशा ‘मनुस्मृती’ नांवाच्या उकीरड्याचा, आमच्या हिंदू धर्माशी कसलाही संबंध नाही… आमचा हिंदू धर्म “भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे” हे सांगणार्या ज्ञानोबांचा आणि “महाराशी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ।।” हे खडसावणार्या तुकोबांचा आहे… त्यामुळं मनुस्मृतीला आम्ही फाडू नाहीतर जाळू… तुम्ही लगेच आम्हाला इतर धर्मांचे धर्मग्रंथ दाखवू नका.
कुराण काय किंवा बायबल काय सगळे मानवतेच्या जवळ जाणारे ग्रंथ आहेत. बुद्धांच्या धम्मानं तर या आमच्या संविधानाला ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ ही अनमोल मुल्यं दिली आहेत ! सगळ्या धर्मांचा आदर ठेवणारा आणि माणसाला माणसासारखी वागणूक देणारा खरा धर्म असतो हे आम्हाला आमच्या हिंदू धर्मातल्या संतपरंपरेनं शिकवलं आहे… तुमच्यासारख्या माणूसघाण्यांनी आम्हाला आमचा ‘धर्म’ शिकवावा एवढे ‘गयेगुजरे’ आम्ही नक्कीच नाही.
“अमुक गोष्ट मुसलमानांना जाऊन सांग!” “दम असेल तर तमुक मुद्दा शरियावाल्यांना सांग!” या तुमच्या आयटीसेलनं दिलेल्या गाजरांना आता कीड लागली आहे. आमच्या फुले, शाहू, आंबेडकर यांनी आधी स्वतःच्या समाजातली घाण साफ केली. त्यांनी “आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून” असं आम्हाला शिकवलं नाही. खरा सुधारक स्वतःच्या घरातला कचरा साफ करतो. ज्यापासून शेजारीपाजारी प्रेरणा घेतील.
भंपक, नालायक माणसं दुसऱ्याच्या घराकडं बोट दाखवत, स्वतःची घाण लपवतात. सारखं ‘मुसलमानांना सांगा… मुसलमानांना सांगा’ अशा कमेन्टस् करून आमच्या हिंदू धर्माला हायजॅक करून हरामखोर विषारी विचारधारेच्या वळचणीला नेण्याचं तुमचं कपट कधीच यशस्वी होणार नाही..अंगेन गात्रम…!










