• Contact us
  • About us
Wednesday, August 26, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दलितांच्या हक्काच्या निधीवर सरकारची ‘लाडकी’ नजर? समाजकल्याण विभागाचे ३४२ कोटी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप!

mahaanewslive by mahaanewslive
August 26, 2026
in सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, महिला विश्व, महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

SC/ST समाजाच्या निधीला कात्री; विद्यार्थ्यांचे शिक्षण, वसतिगृहे, शिष्यवृत्ती आणि दलित वस्ती योजनांच्या पैशांवर प्रश्नचिन्ह

राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाज कल्याण विभागासाठी राखीव असलेला तब्बल ३४२ कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकडे वळविण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सामाजिक न्याय विभागाच्या निधीला अशा पद्धतीने वळसा घातला जात असताना या विभागाचे मंत्री, तसेच सत्ताधारी पक्षातील SC समाजाचे आमदार आणि मंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी राखीव असलेला निधी हा सरकारच्या मर्जीचा पैसा नसून, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वापरण्यासाठी ठेवलेला निधी आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपासून वसतिगृहांपर्यंत, स्वाधार योजनेपासून दलित वस्ती सुधार कार्यक्रमापर्यंत अनेक योजनांचा आधार या निधीवर असतो.

त्यामुळे या निधीतील शेकडो कोटी रुपये दुसऱ्या योजनेकडे वळविण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याचा थेट परिणाम समाजातील गरजू घटकांवर होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध नाही; मात्र एका योजनेसाठी दुसऱ्या समाजाच्या कल्याणाचा निधी का वापरला जातोय? हा या संपूर्ण प्रकरणातील मूलभूत प्रश्न आहे. सरकारकडे महिलांसाठीची लोकप्रिय योजना राबविण्यासाठी निधीची कमतरता असेल, तर त्यासाठी स्वतंत्र आर्थिक नियोजन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, समाजकल्याणासाठी राखीव असलेला निधी त्याच कारणासाठी वापरला जात असेल, तर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.

यातील सर्वात गंभीर परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो. गरीब आणि वंचित कुटुंबातील विद्यार्थी शिष्यवृत्ती, वसतिगृह, स्वाधार यांसारख्या योजनांवर अवलंबून असतात. निधी वळविला गेला आणि त्याचा परिणाम या योजनांच्या अंमलबजावणीवर झाला, तर त्याची किंमत त्या विद्यार्थ्यांना मोजावी लागणार आहे. दलित वस्त्यांमधील मूलभूत सुविधांची कामे रखडली, वसतिगृहांमध्ये निधीअभावी अडचणी निर्माण झाल्या किंवा शिष्यवृत्तीला विलंब झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा सवालही आता उपस्थित होत आहे.
सत्तेतील दलित आमदार गप्प का?

या निर्णयावरून सत्ताधारी पक्षातील अनुसूचित जातींच्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानसभेत अनुसूचित जातींच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे आमदार आणि मंत्री सत्तेत असताना त्यांच्या समाजासाठी राखीव निधी दुसरीकडे वळविला जात असल्याचा आरोप होत असेल, तर त्यांनी सरकारकडे जाब मागण्याची गरज आहे.
समाजाच्या हक्कासाठी आवाज उठविणे हे सत्तेतील लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे की सत्तेतील पद टिकविणे? हा प्रश्न आता दलित समाजातून विचारला जात आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा विषय केवळ ३४२ कोटी रुपयांचा नाही. तो सरकारच्या प्राधान्यक्रमाचा प्रश्न आहे. निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकप्रिय योजनांना प्राधान्य देताना वंचित समाजाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असेल, तर ही बाब गंभीर आहे. सरकारने त्यामुळे या निधी वर्गीकरणाबाबत अधिकृतपणे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. ३४२ कोटींचा निधी नेमका कोणत्या आदेशानुसार, कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या तरतुदीतून वळविण्यात आला, याची माहिती सार्वजनिक करावी. तसेच हा निधी पुन्हा समाजकल्याण विभागाच्या योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे का, याचेही स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे.

कारण लाडकी बहीण ही सरकारची योजना असू शकते; पण दलित विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि विकास योजनांचा पैसा हा त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. सरकारने एका हाताने मदत देताना दुसऱ्या हाताने वंचितांचा हक्क काढून घेतला, अशी भावना समाजात निर्माण झाली तर त्यातून सामाजिक असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे.‌म्हणूनच आता सरकारसमोर एकच प्रश्न उभा आहे, ३४२ कोटींचा हा निधी नेमका कुठून आला, कुठे वळवला आणि त्याचा भार कोणाच्या हक्कावर टाकला?‌ या प्रश्नाचे उत्तर कागदावर नव्हे, तर जनतेसमोर पारदर्शकपणे द्यावे लागणार आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group