दौंड, महान्यूज लाईव्ह
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी उध्दव ठाकरे गट दौंड शिवसेनेने केली आहे.
याबाबत शिवसेनेने दौंड पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. कल्याण येथील हिल पोलीस स्टेशन मध्ये भाजपा आमदार व शिंदे गटाचा पदाधिकारी यांच्यामध्ये भयानक स्वरूपाचा वाद होऊन गोळीबारासारख्या भयंकर घटना पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष झाल्याने गुन्हेगारांवरचा पोलीसांचा वचक राहिला नसल्याबाबत महाराष्ट्राची खात्री झालेली आहे.
या सरकारच्या ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत दौंड शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, अनिल सोनवणे, संतोष जगताप, शहरप्रमुख आनंद पळसे, उपतालुकप्रमुख बापू गायकवाड, नितीन सलमपुरे, विकी थोरात, अमोल भागवत, बाळू गायकवाड, नवनाथ कुंभार, सचिन रणवरे, गणेश कुंभार, अमोल भागवत, अजित सोनवणे, संतोष मंडले, अभिजित भागवत, अभिषेक शेंडगे, यल्लापा माने आदी पदाधिकाऱ्यांनी दौंड पोलीस स्टेशनचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन दिले.











