बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील बाबुर्डीत सातत्याने विद्युत रोहित्र जळण्याच्या घटनेला शेतकरी सामोरे जात आहेत, त्यातून मानसिक त्रास तर शेतकऱ्यांना होतोच आहे, मात्र आता तर चक्क डिपीच चोरट्यांनी चोरून नेला, मात्र त्यामध्ये चोरट्यांनी अगदी व्यवस्थित करंट बसणार नाही अशी व्यवस्था करून विद्युत रोहित्र खाली घेतल्याने शेतकरीही चक्रावले आहेत. वीज वितरण व्यवस्थेतील माहितगार असल्याखेरीज चोरटे हा डिपी चोरीच करू शकणार नाहीत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बाबुर्डी येथील कऱ्हा नदीच्या कडेच्या भागात असलेल्या विद्युत रोहित्रावर ५० ते ६० शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत. एकदा विद्युत रोहित्र जळाले की, बरीच धावपळ करावी लागते. आता ते चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र त्यापेक्षाही चोरट्यांनी अगदी बिनधास्तपणे येणारा वीजप्रवाह फक्त विद्युत रोहित्राच्या ठिकाणीच बंद केला आणि अलगद विद्युत रोहित खाली घेतले. त्यामुळे हा प्रकार वीज क्षेत्रातला वीज वितरण क्षेत्रातला माहीत गरज करू शकतो असे शेतकऱ्यांचे ठाम मत आहे.
दरम्यान महावितरणने अदयाप याची तक्रार दिली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी विद्यत रोहित्र चोरीला गेल्याची कल्पना महावितरणला दिली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर हा तातडीने प्रकार घातला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील यांनी यात गांभीर्याने लक्ष घातले.











