राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यात अवघ्या सहा महिन्यात कोरोना दौंड शहरासह तालुक्यातील तब्बल 70 गावे, वाड्यावस्त्या कोरोना बाधीत झाली आहेत. महत्त्वाची ताजी बातमी ही आहे की, तालुक्यातील आरोग्य विभाग, महसुल विभाग, दौंड पंचायत समिती विभाग, दौंड नगरपालिका विभाग व पोलीस विभागातही कोरोनाने विळखा घातला आहे.
तालुक्यात 1335 वर कोरोना बाधीतांची संख्या पोहचली आहे. यात 833 जणांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात केली आहे. मात्र अद्यापही 469 जण अॅक्टिव्ह कोरोना बाधीत रूग्ण आहेत. तर 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील सहा महिन्यापासू दौंड तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी तालुक्यातील आरोग्य विभाग, महसुल विभाग, दौंड पंचायत समिती विभाग, दौंड नगरपालिका विभाग व पोलीस विभाग या शासनाचे प्रमुख विभाग प्रयत्न करीत आहेत. नागरीकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून योग्य ती उपाय योजना,दक्षता व खबरदारी घेत आहेत.
लॅाकडाऊन पासून ते कोरोना बाधीत प्रतिबंधक क्षेत्र घोषीत होईपर्यंत सर्वच उपाय योजना राबिवल्या, मात्र तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला. नागरीकांचे कोरोना पासून संरक्षण व्हावे यासाठी प्रयत्न करता करता शेवटी शासकीय विभागाचे मुख्य अधिकारी व कर्मचारीच कोरोना बाधीत झाले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोरोनाची तोंड देत असलेल्या आरोग्य विभागात ही कोरोनाचा शिरकाव झाला मुख्य आरोग्य अधिकारासह कर्मचारी बांधीत झाली. दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी यांना ही लागण झाली. कोरोनाची लढा देणारे व तालुक्यात सर्व शासकीय विभागावर निययंण असणारी व आदेश देणारा महसूल विभागाही कोरोनाने सोडला नाही.
तालुक्याचे प्रश्न सोडवता सोडवता तालुक्याच्या बाधीत भागात जावून परिस्थितीची पहाणी करणारे व आपली जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडणारे मुख्य तालुका दंडाअधिकारी यांना ही लागण झाली.
तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी शासकीय यंत्रणेशी समन्वय साधणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आरोग्य विभाग, महसूल विभाग, पंचायत विभाग,नगरपालिका विभागात कोरोनाने शिरकाव केल्याने शासकीय यंत्रणाच बाधीत झाली. मात्र तरीही नागरीकांना हलगर्जीपणा काय सोडला नाही. दौंड शहर,राज्य राखीव पोलीस दल यांच्या सह जवळ जवळ तालुकाच बाधीत झाला.
तालुक्यातील 70 गावे वाड्यावस्त्यांसहीत कोरोना बाधीत झाली. तालुक्याच्या बाधीत गावांत तब्बल 891 जण कोरोना बाधीत झाले आहेत. यापैकी 462 जण कोरोना मुक्त झाले तर 15 जणांचा मृत्य झाला आहे. सध्या 414 बाधीत रुग्णांची संख्या आहे.
शहरात 352 जण कोरोना बाधीत झाले आहेत. राज्य राखीव दलाचे तीन्ही गटात 92 जण बाधीत झाले आहेत. शहरात 352 पैकी 292 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
तालुक्यात सात कोवीड सेंटर कोरोना बाधीत तपासणी व उपचार करण्यासाठी 24 तास सज्ज आहे. मात्र सध्या तालुक्यातील कोवीड सेंटर वाढत्या रूग्ण संख्यामुळे हाऊसफुल आहेत. कोरोनाची चाचणी करण्यासाठी रोज पाचशेच्या आसपास संशियत येत आहेत.
मागील दोन महिन्यात कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणवर वाढू लागली एका दिवसात तब्बल 40 च्यावर बाधीत होऊ लागले आहेत. कुटूंबाचे कुंटुब बाधीत होत आहेत. अक्षरक्षा कोवीड सेंटर मध्ये रूग्णांना जागा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना घरी तर काही खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
रूग्णांसाठी रूग्णवाहिका ही मिळेत नाही अशी भयानक परिस्थिती तालुक्यात झाली असल्याचे चित्र आहे. मात्र तरीही काही नागरीक श बेजाबाबदार पणे वागत आहेत. शासनाच्या नियमांचे उल्लंगन करीत आहेत. विना मास्कचे फिरत आहेत.











