दौंड : महान्यूज लाईव्ह
फक्त लोकांनी दक्षता घेतली नाही ती काय होतं याचा प्रत्यक्ष नमुना मुंबईकरांनी पाहिलेला आहे… त्या तुलनेत गावं जरा बरी होती, पण आता पाटस कडे पाहिलं, तर मुंबई आणि पाटस मध्ये काय फरक नाही असंच वाटू लागेल, कारण नागरीकांची हलगर्जी व दक्षता न घेतल्यानेच आतापर्यंत पाटस मध्ये 93 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे..
शतकाकडे वाटचाल सुरू केलेले पाटसकर मात्र अजूनही बाराच्या भावात आहेत. सुरक्षित अंतराचा अभाव, विनाकारण फिरणे, लग्न, कार्यक्रम आदी कार्यक्रमास गर्दी, सोशल डिस्टींकशन न पाळणे, मास्क न वापरणे अशा हलगर्जीपणामुळेच कोरोनाने कुटूंबेच्या कुटुंब बाधीत झाली आहेत.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवार 1 सप्टेंबरपासून सात दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी व ग्रामस्थांनी घेतला आहे.
दौंड तालुक्यातील मोठी गावे असणारी यवत, पाटस, वरवंड, केडगाव, कुरकुंभ,राहु असे लहान मोठी गावे बाधीत झाली आहे
त.
पाटस मध्ये अॅागस्ट महिन्यात कोरोनाने तांडव घातले आहे. गावठाणासह वाड्यावस्त्यावर आतापर्यंत 600 जणांची कोरोना तपासणी केली आहे, यामध्ये एकुण 93 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. चार जणांचा बळी घेतला आहे.
सध्या 63 जण कोरोना अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर शासकीय कोवीड सेंटर व खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या वाढत्या कोरोना बाधीत रूग्णांमुळे कोवीड सेंटर हाऊस फुल झाले असून अनेक रूग्णांना घरीच उपचार घेण्याची वेळ आली आहे. महसूल विभाग, आरोग्य विभाग,पोलीस विभाग ही शासकीय यंत्रणा हतबल झाली आहे.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. मात्र नागरीकांचा हलगर्जीपणामुळे कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.










