पुणे : महान्यूज लाईव्ह
10 ऑगस्ट रोजी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12 वी व ग्रामीण भागातील 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना सरकारने दिलेल्या आहेत. याबाबतीत सरकारने आदेश काढले आहेत. मात्र आठ ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी काढलेल्या आदेशात मात्र, पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालय शिक्षण संस्थांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. अशा प्रकारची सूचना दिली होती. त्यामुळे शाळा सुरू राहणार की बंद राहणार? हा संभ्रम पुणे जिल्ह्यात तरी कायम आहे.
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने 10 ऑगस्ट रोजी म्हणजे दोन दिवसातच नवा आदेश काढून यामध्ये मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. त्यातच 15 जून 2021 पासून राज्यातील इतर भागात व विदर्भात 28 जून 2019 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत.
मात्र सात जुलै 2019 च्या शासन परिपत्रक अन्वये राज्यातील कोरोना मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यात आले आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता प्राथमिकता असून शालेय शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षणासाठी सातत्याने आग्रही आहे. मात्र मागील वर्षात विविध माध्यमातून प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र आर्थिक सामाजिक, तांत्रिक, विषमता पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे ही गरज लक्षात घेऊन व भारतातील वैद्यकीय संशोधन परिषदेकडून नुकताच चौथा शेरो सर्वे करण्यात आला. या सर्वेक्षणात 6 ते 17 वयोगटातील मुलांचाही समावेश करण्यात आला होता त्यामध्ये 57 पॉईंट दोन टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे देशातील शाळा सुरू करण्यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक यांनी अनुकूल मत नोंदवले आहे. त्याचबरोबर पालकांनीदेखील आपल्या पाल्या शाळेत पाठवण्याची तयारी असल्याचे सर्वेक्षणामध्ये सांगितले आहे. अशा पालकांची संख्या 81 टक्के आहे. या सर्वांचा विचार करता 17 ऑगस्ट 2019 पासून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन तेथील महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील तर 2 ऑगस्ट 2021 चा ब्रेक द चेन मधील सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणेळ अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यातील कोरोना ची सद्यस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील.
अर्थात शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोरोना चा प्रादुर्भाव कमी झालेला असावा अशी अट दिलेली असून, विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असतील. कोणतीही लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवले जाईल व त्यांची लगेच कोरोना चाचणी करून घेतली जाईल, अशा स्वरूपाच्या सूचना शिक्षण खात्याचे सचिव राजेंद्र पवार यांनी 10 ऑगस्ट रोजी दिले आहेत.
अर्थात ‘महान्यूज’ च्या वतीने काही मुख्याध्यापकांची चर्चा करण्यात आली तेव्हा, शासन निर्णयानुसार काही भागात शाळा सुरू होणार, तर स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार काही भागात शाळा बंद राहणार आहेत. मग अभ्यासक्रमाचा समतोल कसा साधता येईल हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल. काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. तसेच ऑनलाईन अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात मर्यादा येत आहेत.
त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही कन्सेप्ट अत्यंत दुबळी झालेली आहे. त्याच बरोबर शाळांना कसल्याही प्रकारची वेतनेतर अनुदान दिले जात नसताना विद्यालयाच्या स्वच्छतेची पूर्ण जबाबदारी शाळांवर दिलेले आहे. अशा सर्व गोष्टींमुळे एक तर ऑनलाईन शिकवता येत नाही. दुसऱ्या बाजूला चालू झालेल्या ऑफलाईन शाळा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बंद झालेल्या आहेत. ही सर्व मुख्याध्यापकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले आहे.











