स्वराज्य हे देशालाच नव्हे तर संपूर्ण जगातील अनेक लढवय्या देशांना व त्यातील लढवय्या प्रमुखांना नेहमीच आकर्षित करीत आले आहे. महाराष्ट्राचा हा इतिहास सर्वांनाच आकर्षित करणारा व प्रेरणादायी ठरला आहे. म्हणूनच अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या तान्हाजीची छाप संपूर्ण देशावरच पडली आहे. तान्हाजीने आतापर्यंत 200 कोटींचा गाठला असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची धूम आहे.
स्वराजाच्या तो काळ आता तान्हाजीच्या रुपाने पुढे येत असून त्यामध्ये व्हीएफएक्स व अॅनिमेशन वापरले असले तरी त्यातील भव्यदिव्यता ही त्या काळातील अडचणी, समस्यांबरोबरच लोकांची लढवय्या वृत्ती दाखवून आताच्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा उर अभिमानाने उंचावण्यास मदत करीत आहे. त्यामुळेच तान्हाजीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा ग्रामीण भागातही सिनेमाघरांमध्ये तिकीटे शिल्लक नाहीत या उदाहरणाने सिध्द करू पाहत आहे. अजय देवगण आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ विकेंडलाच नव्हे तर इतर दिवशी देखील या चित्रपट खूपच चांगली कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत 193 कोटी इतकी कमाई केल्याने या वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूडला एक सुपरहिट चित्रपट मिळाला आहे.










