विक्रम वरे
बारामती : महान्यूज लाईव्ह
ईडी म्हणजे ई पासून एकनाथ शिंदे डी- पासून देवेंद्र फडणवीस हा योगायोग असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली.धनंजय मुंडे यांनी सोमेश्वरनगर बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या साडेसात वर्षांपासून मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे. यंत्रणेचा वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी करण्याची गरज आहे मात्र सध्या तसे होताना दिसत नाही.तसेच ज्या काही केंद्रीय तपास यंत्रणा ह्या देशाच्या सुरक्षितेसाठी वापरल्या जातात.आज त्या स्वतःची खुर्ची स्वतःच्या पक्षाची सत्ता सांभाळण्यासाठी व परत आणण्यासाठी वापरल्या जातात हे दुर्दैव आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशिवाय उपमुख्यमंत्री वेगळा काही निर्णय घेतात अस मला काही वाटत नाही. त्यांच्यामध्ये समन्वय आहे की नाही.हे इतक्या लवकर सांगणं हे थोडस उतावीळपणाचे आहे. थोडासा वेळ जाउ द्या. वेळ गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. एकनाथ शिंदे व देवेंद्र कोणत्या पद्धतीने एकत्र आलेत की ईडीने आणले आहेत हे आपल्याला त्या काळात लक्षात येईल,असेही धनंजय मुंडेंनी सांगितले.