मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेले कित्येक महिने सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील प्रवासी वाहतुक चांगलीच ठप्प झाली होती. परंतू आता न्यायालयाच्या आदेशानंतर एसटीची चाके पुन्हा रस्त्यावर धावण्यास सज्ज झाली आहेत.
एसटीचे एकुण ८२,१८५ कर्मचारी आहेत, आतापर्यंत ६१,६४७ कर्मचारी कामावर आलेले आहेत. अजून २०, ४६१ कर्मचारी कामावर परतणे बाकी आहे. न्यायालयाने कामगारांना २२ एप्रिलपुर्वी कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर या वेळेपर्यंत कामावर हजर झाला नाही, तर त्या कर्मचाऱ्यांची सेवा समात्प केली जाणार असल्याचेही म्हणले जात आहे. त्यामुळे उर्वरीत २०,४६१ कर्मचारीही पुढील दोन दिवसात कामावर हजर राहण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा खरा फटका ग्रामीण भागाला बसला होता. ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचाच खरा आधार होता. आता एसटी पुर्ण क्षमतेने सुरु झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.