पोलिस शिपायांच्या ८ हजार जागांपासून होणार सुरवात
नाशिक
: महान्यूज लाईव्ह
भाजपच्या सरकारने
अडकवलेली महाभरती आता महाविकास आघाडी सरकार पूर्ण करणार आहे, आज नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी ही माहिती दिली.
नाशिकमधील
कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, आम्ही सरकारच्या अखत्यारीतील रिक्त जागा
भरण्याचा निर्णय घेतला आहे, सुरवातीस आम्ही राज्यात पोलिस भरती घेणार आहोत.
या माध्यमातून 8 हजार
पोलिस शिपायांची पदे भरली जाणार आहेत. ती भरती
झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागांच्या आढाव्यानुसार नोकरभरती होईल. अर्थात
राज्यात ६० ते ७० हजार पदांची ही भरती
होईल.
दरम्यान भाजपने मागील कार्यकाळात राज्यातील रिक्त पदे
भरण्याचा निर्णय घेतला होता. त्याला महाभरती असे नाव देऊन राज्यातील
युवकांना आकर्षित केले होते. मात्र संपूर्ण कार्यकाळात ही भरती पूर्ण होऊ शकली
नाही. त्यातच अनेक भरती प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिल्याने गोंधळाचे
वातावरण राहिले.
आता महाविकास आघाडी तरी हा गोंधळ कमी
करून खरोखरच युवकांच्या अपेक्षा पूर्ण करणार का असा सवाल उपस्थित होत
असून आज अजित पवार यांनी त्याची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे, प्रत्यक्षात ज्यावेळी भरती सुरू होईल,
तेव्हाच खरे
अशाच प्रतिक्रिया युवकांनी व्यक्त केल्या आहेत.










