टेंभुर्णी, महान्युज लाईव्ह
सोलापूर जिल्ह्यातील वीज कनेक्शन कपात वारंवार केल्यामुळे मगरवाडी (ता.पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरज जाधव या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नाकारते पणामुळेच ही घटना घडली असून पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी दिला आहे.
सततची नापिकी…. वारंवार निवेदने-आंदोलने करुनही सरकारच्या आदेशावरून महावितरण कंपनीने चार महिन्यांत वीज तोड केली आहे. हे होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले सुध्दा नाहीत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने निष्क्रिय पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरकु देणार नाही. येत्या रविवारी सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा नियोजित दौरा संभाजी ब्रिगेड उधळून लावणार आहे.अशा इशारा सचिन जगताप यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परवा केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी तीव्र संतापा व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांन मध्ये नैराश्य निर्माण झाले असून त्यातूनच आज सुरज जाधव या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आम्ही गेली चार महिने वीज महावितरण कंपनीकडून वारंवार वीज खंडित केल्या जात असलेल्या प्रश्नावर आंदोलने केली.
परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एकदाही सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न ना विधानभवनात लावून धरला, ना जिल्ह्यातील वीज महावितरण अधिका-यास फैलावर घेतले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांनी वीजपुरवठा सुरळीत करुनच जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांसाठी यावे. अन्यथा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांचा कार्यक्रम उधळून लावतील अशा संभाजी ब्रिगेड ने दिला आहे.