मुंबई : महान्यूज लाईव्ह
बारावीचा निकाल वाढल्याने तुकड्यांची अडचण आहे, मात्र महाविद्यालयांकडून तुकड्या वाढविण्याची मागणी करणारे पत्र पाठविण्याचे आदेश दिल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अर्थात बारावीच्या निकालानंतर प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार नाही. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे निकाल हे बारावीच्याच निकालावरून दिले जाणार आहेत असे त्यांनी स्पष्टय केले.
उदय सामंत यांनी यासंदर्भात आज माहिती दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ ऑगस्ट पासून व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा ४ ते ९ सप्टेंबर व ९ ते १४ सप्टेंबर अशा दोन सत्रात होणार आहेत.
एलएलबी सीईटी परीक्षा १६ ते ९ सप्टेंबर या दरम्यान होणार आहेत अशी माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान व्यावसायिक व पारंपारिक अभ्यासक्रमाच्या सीईटीचे धोरण जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जिथे कोरोना कमी, तिथे महाविद्यालय सुरू होणार
दरम्यान आज एक महत्वपूर्ण घोषणा उदय सामंत यांनी केली. ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्णसंख्येचा दर कमी आहे, त्या ठिकाणचे महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना कुलगुरूंना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरणही केले जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. विद्यापीठांतर्गत असले, तरी जिल्हानिहाय महाविद्यालये सुरू करण्यासाठीचे निकष वेगवेगळे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.