विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभर आपली ठळक छाप निर्माण केली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्या ३९ व्या दीक्षांत समारंभात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४ सुवर्णपदके पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
पहिल्याच बॅचचा ऐतिहासिक पराक्रम
२०२२–२०२३ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात प्रथमच पदव्युत्तर (Postgraduate) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. एकूण ११ विषयांमध्ये हा अभ्यासक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचने ४ सुवर्णपदके मिळवून महाविद्यालयाचा लौकिक उंचावला, ही बाब अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे.
या यशामध्ये खालील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला:भाजीपाला शास्त्र विभाग – कुमार चैतन्य व्हनकळसकृषि अर्थशास्त्र विभाग – कुमारी किरण भोसले वनस्पती विकृतीशास्त्र विभाग – कुमार आशिष बच्छाव पशुधन उत्पादन व व्यवस्थापन विभाग – कुमारी प्रीतम वीरकर
या दीक्षांत समारंभाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यामध्ये राज्यपाल जिष्णु देव वर्मा,मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,कृषीमंत्री दत्तात्रय भरणे,राधाकृष्ण विखे पाटील,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे,संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार,विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, उपप्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड तसेच विभाग समन्वयक प्रा. ए. बी. रासकर यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले.
सध्या महाविद्यालयात:एम.एस्सी. कृषि अंतर्गत ९ विभाग एम.एस्सी. उद्यानविद्या अंतर्गत २ विभाग अशा एकूण ११ विभागांमध्ये पदव्युत्तर शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीसाठी सक्षम करण्यासाठी पुढील विषयांवर विशेष भर दिला जात आहे:
ए.आय. (AI) व रोबोटिक्सचा शेतीत वापर सेंद्रिय व विषमुक्त शेती,मातीविरहित शेती,जैविक कीड व रोग नियंत्रण हवामान बदलाशी सुसंगत पिके,मिलेट (ज्वारी, बाजरी) संशोधन महाविद्यालयात संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा व आधुनिक उपकरणे पीक चाचणीसाठी सुसज्ज शेतजमीन
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ (दापोली) आणि राहुरी कृषि विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद च्या विविध संशोधन केंद्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संशोधन करण्याची संधी मिळत आहे.
कृषि क्षेत्रातील बदलते स्वरूप, हवामानातील अनिश्चितता आणि वाढत्या अन्नसुरक्षेच्या गरजा लक्षात घेता संशोधनामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीचे हे महाविद्यालय आधुनिक शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम कृषी तज्ञ घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.











