इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाने या गळीत हंगामासाठी 14 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज फेसबुक पेज वर पाहू शकता
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2020- 21 चा 31 वा गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पूजन समारंभ आज विधिवत पुजेसह राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी कारखाना या हंगामात विक्रमी ऊस गाळप करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रामध्ये हजर झालेले आहे तसेच या हंगामामध्ये डिस्टीलरीचे उत्पादन एक कोटी तीस लाख लिटर, सहवीज निर्मिती तीन कोटी युनिट, बायोगॅस बारा लाख घनमीटर, सेंद्रिय खत 4 लाख बॅग, कंपोस्ट खत 24 हजार मेट्रीक टन व जैविक खते /औषधे 20 हजार लिटर एवढे उत्पादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने या हंगामामध्ये ठेवले आहे.
मागील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाची उर्वरित एफ. आर. पी. ची रक्कम लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली. तसेच चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या उसास आजूबाजूचे कारखान्यांच्या बरोबरीने उसाला दर दिला जाईल व दर पंधरवड्याला उसाची बिले व ऊस तोडणी वाहतूक दाराची बेल संबंधित सभासदांचे व वाहतूकदारांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावर्षी आपले कार्यक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळेच कारखान्यास उसाची उपलब्धता मुबलक आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक सभासद, कारखान्याचे वाहतूकदार, तोडणी मुकादम व सर्व कामगार यांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करून हा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा मानस पाटील यांनी रयतव्यक्त केला.
या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे ,अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, पांडुरंग गलांडे ,सुभाष भोसले, जयश्री नलवडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व सर्व खाते विभाग प्रमुख उपस्थित होते.
या हंगामामध्ये कर्मयोगी 75 लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करणार असून उत्पादित इथेनॉल ऑइल कंपन्यांना विक्री करणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.











