महान्यूज करीअर अपडेट
राज्य लोकसेवा आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी मर्यादा लागू केली आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगा प्रमाणे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षादेखील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना फक्त सहा वेळा तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना फक्त नऊ वेळा देता येणार आहे.
अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना मात्र ही मर्यादा लागू असणार नाही. याखेरीज उमेदवाराची उमेदवारी रद्द झाली किंवा तो अपात्र झाला तरीदेखील त्या परीक्षेस उपस्थित होता असेच मानले जाणार आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एखाद्या पेपरसाठी उपस्थित राहिला, तर ती त्याची त्या वर्षीची संधी समजली जाणार आहे.
दरम्यान एमपीएससीच्या या अनाकलनीय निर्णयाला विरोध होण्याची शक्यता असून, मराठा संघटनांनी आतापासूनच विरोधाला सुरुवात केली आहे. ओबीसी प्रवर्गातूनही या निर्णयास विरोध होण्याची शक्यता आहे.