• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दादा नाही.. साहेब नाही.. खरंतर भाजपच जिंकला! शेवटचा बलाढ्य विरोधक कमकुवत झाला! आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच..

Maha News Live by Maha News Live
July 6, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, Featured
0

संपादकीय

राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर आता भाजप ॲक्शन मोडमध्ये आला आहे. एकीकडे शिंदे गटातही भांडणे सुरू झाली आहेत आणि दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचे चित्र महाराष्ट्रात असतानाच ज्या महाविकास आघाडीच्या मजबुतीमुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणे अवघड होत होते, त्याचा मार्गाचा मोकळा झाला आहे. त्यामुळे ज्या निवडणुका गेले काही महिने पुढे टाळल्या जात होत्या, त्या आता लागलीच होतील तशा स्वरूपाची चर्चा आता सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाला ज्या गोष्टीची इतक्या दिवस आतुरता होती, ती गोष्ट आता भारतीय जनता पक्षाच्या मनासारखी झाली असून सहकार आणि इतर ठिकाणी भाजपला शिरकाव करणं आता सहज शक्य होणार आहे. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मांड रोवली आणि आपल्याच सहकारी असलेल्या शिवसेनेला दूर करत एकहाती सत्तेचे समीकरण गाठण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले, तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लक्षात अनेक गोष्टी यायला यावयास हव्या होत्या.

राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कालच्या शक्ती प्रदर्शनात दादा किंवा साहेब याचीच चर्चा जाणवत असली, तरी प्रत्यक्षात यातून फायदा भारतीय जनता पक्ष झाला आहे. आसाममध्ये आसाम गण परिषदेबरोबर युती केल्यानंतर संपूर्ण आसाम राज्य ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला जेवढा काळ लागला, त्यापेक्षा कमी काळ हा पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात लागलेला आहे. अंधेरीतील निवडणुकीपासून ते कालपरवाच्या राजकीय परिस्थितीपर्यंत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील लढाई अवघड वाटत होती, मात्र आता भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अजित पवार यांच्या बंडाच्या स्वरूपाने सोपी करून ठेवलेली आहे.

आता काँग्रेसचे निम्मे आमदार फोडले की हे संपूर्ण राज्य आपले असे म्हणायला भारतीय जनता पक्ष मोकळा होणार आहे. त्यामुळेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसेच महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली तर आता आश्चर्य वाटायचे कारण नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपुरतेच शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा पवार गट भारतीय जनता पक्षाने हाताशी धरला आणि विधानसभेच्या वेळी प्रत्येकाला स्वतंत्र लढायला लावले तर तेही आश्चर्य वाटायला नको.

कालपरवापर्यंत राज्यातील परिस्थिती ही भारतीय जनता पक्षाच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला विटलेली जनता आणि कंटाळलेली जनता असेच होते. भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला वैतागून महाविकास आघाडीकडे मतदारांचा कल अधिक वाढत होता. हे लक्षात घेत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अनेकांच्या पाठीशी लावला हेही महाराष्ट्राला माहित आहे, मात्र राजकीय महत्त्वकांक्षेपोटी आता प्रत्येक पक्षाची शकले होऊ लागल्याने या पुढील काळात एकसंघ भारतीय जनता पक्षाला हे राज्य ताब्यात घ्यायला वेळ लागणार नाही आणि हेच आजच्या घडीचे राजकारणाचे सार आहे.

लोकशाहीत पूर्वी पक्षांतर व्हायचे. घाऊक पक्षांतरही झालेले अनेकांनी पाहिले आहे. परंतु पक्षांतराऐवजी थेट पक्षच ताब्यात घेण्याचे प्रकार गेल्या वर्षात जे सुरू झाले आहेत, त्याची महाराष्ट्रातील स्थिती लक्षात घेता लोकशाही आता नावालाच राहिली आहे, असे जे कोणी गळे काढत आहेत ते अगदीच चुकीचे नाही. गंमत म्हणजे महाराष्ट्रात आता पक्ष नाही, तर गट निवडणुकीच्या काळात भिडतील आणि भारतीय जनता पक्ष मात्र एक संघपणे निवडणुकांना सामोरे जाईल, त्यावेळी भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता संपूर्ण महाराष्ट्रात असेल हे सांगायला आता ज्योतिषाची गरज उरणार नाही.

सोलापूरचे एकहाती साम्राज्य हातात ठेवणाऱ्या मोहिते पाटलांपासून विखे पाटलापर्यंत आणि लातूरच्या देशमुखांपासून ते बारामतीच्या पवार कुटुंबापर्यंत आता इथून पुढच्या काळात संपूर्ण जिल्हे ताब्यात फक्त आमच्याच असे आता कोणी म्हणू शकणार नाही, अशी परिस्थिती भारतीय जनता पक्षाला करायची आहे. य मोहिमेत त्यापैकी फक्त पवार कुटुंब उरले होते. आता तिथे ही परिस्थिती उरणार नाही, अशी तजवीज भारतीय जनता पक्षाने करून ठेवली आहे. राज्यातील अस्मितेचे राजकारण परंपरागत तयार करून ठेवणाऱ्या शेवटच्या बलाढ्य विरोधकाची ताकद क्षीण करण्याचा प्रयत्न भाजपने केला असून या पुढील काळात आता रखडलेल्या निवडणुका लवकरच होतील असे समजायला हरकत नाही.

Next Post

…दौंडवर भाजपचे आमदार राहुल कुल यांचाच मक्ता राहणार की अजित पवारांच्या आक्रमक दावेदारी पुढे जागा रमेश थोरातांसाठी मिळणार? नवी युती कोणासाठी धोक्याची घंटा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group