• Contact us
  • About us
Thursday, September 28, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातील सर्वात मोठ्या स्वयंशिस्तीच्या सोहळ्याला गालबोट का लागलं? फडणवीस म्हणतात लाठीमार झालाच नाही! पण याच ठिकाणी उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील कोणाचे सरकार असतं तर?

Maha News Live by Maha News Live
June 12, 2023
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, Featured
0

पुणे : महान्यूज लाईव्ह 

तीनशे वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या पंढरीच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच व्यवस्थापनातील गलथानपणामुळे वारकऱ्यांना लाठीमाराला सामोरे जावे लागले. आळंदीतील वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची समाजातून व सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. सामान्य नागरिकांनी देखील याचा निषेध करत आता तुषार भोसले यांच्यासह कथित वारकरी नेते कुठे गेले आहेत? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मात्र लाठीमार झाला नसल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या काळात वारकरी महिला जखमी झाल्या होत्या असे स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर टीका केली असून आमदार रोहित पवार यांनी देखील यावर टीका केली आहे. मंदिर व्यवस्थापनाने यावर्षी केवळ ४७ दिंड्यांना व दिंड्या मधील प्रत्येकी ७५ वारकऱ्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वादाचा प्रसंग निर्माण झाला. टाळ भिरकावत वारकऱ्याने पोलिसांना प्रतिकार केल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराबाहेर ही घटना घडली. यानंतर काही काळ पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला.

या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे संतप्त पडसाद उमटले. मात्र सध्या विरोधक कमजोर आहेत आणि सत्ताधारीच विरोधकांची ही भूमिका सोयीनुसार बजावतात, त्यामुळे या अत्यंत निषेधार्ह घटनेच्या वेळी देखील शांतता होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार असं म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्ती परंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे.

ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी. कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारीसारख्या सोहळ्यात सहभागी होताना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावं, असं आवाहन आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्यावेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वारीच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली. राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येणारे काही बोगस वारकरी या सोहळ्यात घुसल्याने खऱ्या वारकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचं पाप या सरकारने केलं. 

भक्तपरंपरेचा हा सोहळा राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सरकारने बोगस वारकऱ्यांना आधी दूर ठेवण्याची गरज आहे. नियोजनाच्या नावाखाली मंदिरामध्ये सामान्य वारकऱ्यांना येऊ दिल जात नसल्याचं आज मीही पाहिलं, त्याचं राजकारण करायचं नाही, पण आता हे अति होतंय. शिवाय लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? हे कथित हिंदुत्त्ववादी राज्य सरकारने सांगावं.. अशी घटना विरोधी पक्षाचं सरकार असताना घडली असती तर भाजपने आणि त्यांच्या कथित अध्यात्मिक आघाडीने तांडव केलं असतं. शिवाय केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? हाही प्रश्न आहेच.

Next Post

अचानक एसटी पेटली.. अवघ्या काही मिनिटांत जळून खाक झाली..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंदापूर तालुक्याच्या सुपुत्राला साखर उद्योगातील 28 वर्षाच्या अमूल्य योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार!

September 27, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंनी इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २० कोटींचा निधी केला मंजूर!

September 27, 2023

ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी रावणगावला मेंढ्या बकरीसह तीन तास रास्ता रोको आंदोलन!

September 27, 2023

संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच दोन्ही चाकं निखळली..! जेजुरीच्या देवदर्शनासाठी आले, पण तेवढ्यात रिक्षा विहिरीत पडली.. सासवडजवळ नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू!

September 26, 2023
बावनकुळेंचा चहा पत्रकार नाकारतील का ? निवडणूकांचे पॅकेज विकण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारात जाणे थांबवतील का?

बावनकुळेंचा चहा पत्रकार नाकारतील का ? निवडणूकांचे पॅकेज विकण्यासाठी राजकीय पक्षांच्या दारात जाणे थांबवतील का?

September 26, 2023
भीमा पाटस कारखान्याच्या अहवालाची पाटस ग्रामस्थांनी केली होळी! सहकार महर्षी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा अहवालात फोटो न छापल्याने संताप!

भीमा पाटस कारखान्याच्या अहवालाची पाटस ग्रामस्थांनी केली होळी! सहकार महर्षी स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा अहवालात फोटो न छापल्याने संताप!

September 26, 2023
लोणार येथे भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न! जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची उपस्थिती!

लोणार येथे भव्य दिव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न! जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची उपस्थिती!

September 26, 2023
पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार “संदीप उर्फ संभाजी कदम” यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

पाटस पोलिस चौकीचे डॅशिंग पोलिस हवालदार “संदीप उर्फ संभाजी कदम” यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी! उपचारादरम्यान मृत्यू! अपघातात झाले होते गंभीर जखमी!

September 25, 2023
इंदापुरातला ‘ नाचणारा घोडा ‘ आणि ‘ रेसचा घोडा ‘ कोण ? हर्षवर्धन पाटलांवर त्यांचे चुलत बंधू प्रशांत पाटलांची जळजळीत टिका !

शेटफळ तलावात पाणी सोडण्याच्या निर्णयावरून आमदार भरणे यांची श्रेय घेण्यासाठी धडपड पण…! आमदार कालवा समितीच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते.! तो निर्णय मी करुन घेतला.. हर्षवर्धन पाटलांचा दावा

September 25, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची दौंड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर! दौंड तालुकाध्यक्षपदी उत्तम आटोळे यांची बिनविरोध निवड! तालुक्यातील अनेकांना जिल्हा पातळीवरही संधी!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची दौंड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर! दौंड तालुकाध्यक्षपदी उत्तम आटोळे यांची बिनविरोध निवड! तालुक्यातील अनेकांना जिल्हा पातळीवरही संधी!

September 25, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group