सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणारा ‘बलोच’ हा चित्रपट उद्या (दि.५ मे) महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा ‘बलोच’ या चित्रपटात आहे.
पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले वास्तव या चित्रपटात साकारले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेच्या परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून बारामतीचे सुपुत्र अशोक समर्थ आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटाचे प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शक आहेत. यात प्रवीण तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश पवार यांची कथा आणि पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.