• Contact us
  • About us
Saturday, September 23, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाब्बास पठ्ठ्यांनो..! दोन भावांनी रस्त्यावर हातोहात विकली तब्बल १२५ टन द्राक्षे..! कोण म्हणत खपत नाही.. शेतकरी स्वतः विकत नाही..!

tdadmin by tdadmin
March 16, 2023
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

विक्रम वरे, बारामती.

या कहाणीची सुरवात होते, काटेवाडीतून.. मिलींद व नितीन काटे या दोन शेतकरी भावांची ही कहाणी.. स्वतः रस्त्यावर उन्हातान्हात थांबून शेतीचं उत्पन्न दुप्पट करून घेतलेली ही बळीराजाची यशोगाथा.. अगोदर अधिक क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या काटे कुटुंबाने स्वतः पिकवायचं व स्वतःच विकायचा निर्णय घेतला.. आणि आज गेली पाच वर्षे ते स्वतःच्या बागेतील द्राक्षे स्वतःच विकतात..थोडीथोडकी नव्हे त्यांनी तब्बल १२५ टनांहून अधिक द्राक्षे रस्त्यावर उभे राहून विकली आहेत..

काटेवाडीतील सविता फार्म हा श्रमाच्या पुजाऱ्यांच्या घामांनी अधिकच फुलला आहे, मागील पाच वर्षापासून या द्राक्षाच्या फार्मने जी कात टाकली, ती भल्याभल्या शेतकऱ्यांनाही अचंबित करणारी ठरली आहे. गेली पाच वर्षे मिलींद व नितीन काटे हे दोन भाऊ आपल्या द्राक्ष बागेतील उत्पादित द्राक्षे व्यापाऱ्यांना न देता स्वतःच रस्त्यावर विकतात. त्यांना रस्त्यावर द्राक्षे विकण्याचा फंडा सापडला आहे आणि एकूणच काटेवाडीतील अनेक शेतकरी आता याच मार्गाने आपापली उत्पादित द्राक्षे रस्त्यावर स्टॉल उभारूनच विकतात.

नोटबंदीने दिले आत्मनिर्भरतेचे बळ..

नोटबंदी झाल्यानंतर फळबागा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अंगात आलं. त्यांनी याचा दुहेरी फायदा घेतला. नोटबंदीमुळे उठाव नसल्याचे सांगत फळांचे दर पाडले, दुसरीकडे दोन लाखांपेक्षा अधिकची रक्कम रोख देता येत नाही असा सूर लावला. वास्तविक पाहता द्राक्ष, डाळींब, केळी, बोर या पिकांच्या एका एकराची उत्पादनाची किंमत कितीतरी अधिक असते, अशावेळी हे व्यापारी धनादेश द्यायचे.

अनेक शेतकऱ्यांचे धनादेश वठायचेच नाहीत. मग कोर्टात जा किंवा त्या व्यापाऱ्याच्या मागे चकरा मार असे ठरलेले असायचे. या साऱ्या अडचणीच्या बाबी हेरून मिलिंद व नितीन यांनी द्राक्षबागेचे क्षेत्र कमी केले व कमी केलेल्या क्षेत्रातील उत्पादित द्राक्षे व्यापाऱ्याला द्यायची नाहीत, त्याऐवजी स्वतः विकायची हे ठरवले.

हे करताना त्यांनी हवामानाचा अंदाजही घेतला. त्यानुसारच छाटणी व उत्पादनाचे गणित ठरवले. आता गेली पाच वर्षे ते रस्त्यावर आपली द्राक्षे विकतात. अगदी याच वर्षीचे गणित पाहिले, तर त्यांच्या द्राक्षाला व्यापाऱ्याकडे प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळाला असता, मात्र हीच द्राक्षे नंतर बाजारात ६० ते ७० रुपये किलोने विकली गेली असती, मग नितीन व मिलींद यांनी यातून सुवर्णमध्य साधून या द्राक्षाची किंमत ५० रुपये किलो ठेवली.

आता त्यांनी पाच स्टॉल उभे केले आहेत. एक स्टॉल बारामतीतील एमआयडीसी चौकात तर इतर स्टॉल इंदापूर- बारामती राष्ट्रीय महामार्गालगत उभे केले आहेत. दररोज सरासरी १ टन द्राक्षांची विक्री होत होती. आतापर्यंत त्यांनी २२ टन द्राक्षे विकली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत त्यांची उत्पादित द्राक्षे संपतील.

जर मिलींद व नितिन यांनी पिकवलेली द्राक्षे व्यापाऱ्याला २० रुपयांनी दिली असती, तर त्यांना हा ५० रुपयांच्या दरातील फरक मिळालाच नसता.. मात्र ते शेतकरीही बनले आणि विक्रेतेही.. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा.. इथल्या रानोमाळ बहरतील चैतन्याच्या बागा.. चैतन्याच्या बागा आणि आयुष्यात चैतन्य आणणाऱ्या या बळीराजाच्या आयडीयाच्या कल्पनेला महान्यूजचा सलाम..

Next Post
अरे व्वा.. पवारसाहेब भाजप व राष्ट्रवादी पक्ष चालवतात तर..!  बावनकुळेंचे सुप्रिया सुळे यांनी आभार  मानले.. राज ठाकरे यांचे कौतुक केले.. भाजपने उपमुख्यंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर अन्याय केला म्हणत नाराजीही व्यक्त केली..

दक्षिण भारतात जाणाऱ्या आणि येणाऱ्या ३६ गाड्यांना दौंडमध्ये थांबा द्यावा! खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील !

September 22, 2023

हरवले आभाळ ज्यांचे.. तयांचे झाले सोबती..! शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णा!

September 22, 2023

बारामतीच्या उंडवडी सुप्यात 14 गावातील शेतकरी 22 सप्टेंबर पासून चक्री उपोषणाला बसणार!

September 21, 2023

पावसाचं भीषण संकट! वाई तालुक्यातील चांदकच्या ग्रामस्थांनी पावसासाठी चक्क देवाधिदेव महादेवांना कोंडलं!

September 21, 2023

मांढरदेव काळेश्वरी देवीचा दर्शन गाभारा आठ दिवसांसाठी बंद!

September 21, 2023

चक्क एका पाण्याच्या बाटलीनेच स्टोरी सांगितली..७० हजार रुपयांची इंटरनेटची केबल कोणी चोरली?

September 21, 2023

असला कुठे जावई असतो काय? सासरवाडीत एका पाठोपाठ सहा जणांना भोसकले, बायकोसह तीन जण जागीच गेले!

September 21, 2023

शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सातारा जिल्हयातुन हद्दपार! शिरवळ पोलीसांची कारवाई

September 21, 2023

अंकिता पाटील ठाकरे आता भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्ष!

September 21, 2023

महाराष्ट्रातलं बहुचर्चित राहणारं पार्टी ट्रस्ट यंदा सांगोल्यात बरं का!

September 21, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group