बारामती : महान्यूज लाईव्ह
२६ फेब्रुवारीच्या रविवारी वालचंदनगरच्या रत्नपुरी पाठशाळेत जवळपास ३०० विद्यार्थी जमले होते. हे आज नव्हे तर ४० ते ४५ वर्षापुर्वी या शाळेत विद्यार्थी म्हणून शिकत होते. हे सर्वजण माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि गुरुजन स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते.
वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत साळुंखे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या शाळेत शिकलेले सुर्यकांत ताम्हणकर, नामदेव खरात, भारत चव्हाण, रमेश राजपूरे, भगवान वाघमोरे आणि बाबु अस्वले या भारतीय सैन्य दलात देशसेवा करीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
रत्नपुरी आणि वालचंदगरचे त्यावेळचे वैभव काय असेल, त्याचा इतिहास किती जाज्वल्य असेल हे मला समोर बसलेल्या उपस्थितांना बघून जाणवत असल्याची भावना प्रमुख पाहूणे विक्रांत साळुंखे आपल्या भाषणात व्यक्त केली. येथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला एक विलक्षण आनंद जाणवतो. अशा मेळाव्याला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहण्यास मिळाले यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो असेही श्री. साळुंखे म्हणाले.
या कार्यक्रमास उपस्थित सर्व गुरुजनांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी रत्नपुरी पाठशाळेत शिकणाऱ्या इ. १ ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सॅक, कॅप, पाणी बॉटल, शुज, पॅड आणि पट्टीचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले.
या मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये बाळू सूर्यवंशी, नंदू प्रभुणे, गुरु मनचाली, नंदु कुलकर्णी, हनुमंत माने, सुनील दुगाणी, राजू बोंद्रे, शोभा दुगाणी, अंजली कारखानीस, सुवर्णा प्रभुणे यांनी शाळेतील अनेक आठवणी सांगितल्या. गुरुजनांपैकी सुतकर गुरुजी, सौ. गाडेकर, सौ. भालेराव, श्रीमती शहा बाई, श्रीमती देगलूरकर बाई, विद्या देशपांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी बाळासाहेब सावंत यांच्या गाण्याने या कार्यक्रमास रंगत आली. या मेळाव्यासाठी राजु पठाण, दिलीप सावंत, कैलास दोशी, चंद्रकांत संतीकर, विजय रणदिवे, बाळासाहेब सावंत, बाळू सूर्यवंशी, वसंत राजपूरे, सुनील दुवाणी, बबन तान्हणकर, नामदेव खरात, शंतनू सुतार, भीमराव रामगुडे, मल्लाप्पा दुगाणी, नामदेव भोसले, भालचंद्र गुर्जर, भास्कर क्षीरसागर, प्यारेलाल तांबोळी हे यावेळी सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित होते.
अनील संतीकर, मधुकर गुळीक, सुनील दुवाणी, नंदु प्रभुणे, बाळू पुकळे, चंद्रकांत संतीकर, प्रदीप निलाखे, बाबा पाखरे, रफिक पठाण, नंदु कुलकर्णी, अंजली कारखानीस,बाळासो. पवार वकील, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब गायकवाड आणि धनंजय माने यांनी खुप मेहनत घेतली.
आलेल्या सर्वांचे वैभव टंकसाळी आणि हनुमंत माने यांनी स्वागत केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक तानाजी पुकळे व धनंजय माने यांनी केले. आभार उमेश दुगाणी यांनी मानले.
भविष्यात पुन्हा असा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले आहे.