• Contact us
  • About us
Tuesday, June 6, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओझर्डे बनली वाई तालुक्यातील पहिली अत्याधुनिक शाळा..! शाळेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लोकार्पण सोहळा संपन्न

tdadmin by tdadmin
February 24, 2023
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
ओझर्डे बनली वाई तालुक्यातील पहिली अत्याधुनिक शाळा..! शाळेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लोकार्पण सोहळा संपन्न

दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह

वाई तालुक्यातील ओझर्डे गावची शाळा ही महाराष्ट्रातील पहिली स्टेम लॅब असलेली अत्याधुनिक शाळा बनली, या शाळेतील अधुनिकीकरणाच्या कामाचे उद्घाटन नुकतेच झाले. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे या शाळेत हे उदघाटन झाले.

यावेळी शाळेचे कंपाउंड, वर्ग खोल्या नूतनीकरण, ध्वज स्तंभाच्या कामाचे पूजन अशा विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच EDGEFX मार्फत महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली STEM लॅब या शाळेत उभारण्यात आली आहे, तिचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे यांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बेलोशे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अभयकुमार साळुंखे होते.

त्यांनी बापूजींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या काळातील अडीअडचणी सांगितल्या. सन 1960 साली स्थापन झालेल्या शाळेचा पूर्वीचा अवतार व पन्नास वर्षानंतरच्या शाळेचा अवतार यात खूप बदल झालेला दिसून येत असल्याची टिप्पणी प्रा. साळुंखे यांनी केली.

ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला प्राधान्य देऊन पतित होऊन पावन विद्यार्थी घडावेत व ते पुढील आयुष्यात उज्वल व्हावेत. बापूजींनी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेऊन आपले पूर्ण आयुष्य समाज घडवण्यात घालवले. त्यांना संत गाडगेबाबा यांचा मोठा सहवास लाभला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय केले पाहिजे यातून या संस्थेचा विचार मनात आला व त्यांनी शिक्षण तळागाळात पोहोचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

बैलगाडी मधून त्यांनी 11 जिल्ह्यात 176 शाळा चालू केल्या बापूजी ज्या गावात जायचे त्या गावातील लोकांना ते आवाहन करून लोकांची साथ घेऊन तेथे शाळा चालू करत होते. समाजात शिक्षण प्रसार करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता व लोकांनी शिक्षण घेऊन आपला देश प्रगत करावा असे त्यांना वाटत होते. ग्रामीण भागात शिक्षण नव्हते म्हणून त्यांनी ग्रामीण भागात आपले लक्ष केंद्रित केले.

त्यामुळे आज अडीच लाख लोक या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रात शाळा शिकत आहेत. याच लोकांना बापूजींनी ज्ञानाचा वसा दिला. आजच्या काळात शिक्षक हे गटबाजी करत असतात, परंतु या संस्थेतील शिक्षक बापूजींचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. गांधीवादी विचार मनात घेऊन या संस्थेची स्थापना बापूजींनी केली. बापूजींनी शिक्षकांच्या मनात चांगले विचार बिंबवल्याने विद्यार्थी देखील चांगले घडले असे प्रा. साळुंखे म्हणाले. अभय कुमार साळुंखे यांनी Education fx हैदराबाद या कंपनीचे आभार मानले. फाउंडेशनने सात लाखाची मदत करून शाळेस पुनर्जीवित केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.

या कार्यक्रमास प्रा. अभयकुमार साळुंखे, फाउंडेशन सातारा,जेष्ठ शाळेसाठी जागा देऊन योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दौलतराव पिसाळ, शहीद सोमनाथ तांगडे यांच्या वीर पत्नी रेश्मा तांगडे, अजित फरांदे, शाळा व्यवस्थापन समिती, स्टीम लॅबचे राजदीप जमादार, मनोज यादव, प्रकाश कुंभार, गणेश बाबर, पत्रकार आशिष चव्हाण, गावचे सरपंच, ग्रामस्थ, शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आभार श्री. फरांदे यांनी मानले.

Next Post
कोल्हापूरशेजारच्या कणेरी मठाच्या पंचमहाभूत लोकोत्सवातील शिळे अन्न खायला दिल्याने ५० गायींचा मृत्यू!

गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात! घटना अतिशय दुर्दैवी, श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचा खुलासा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंदापूरच्या पालखीतळाच्या कामात भ्रष्टाचार? विजय शिवतारेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार!

June 6, 2023

देशात मान्सून लांबला.. सन 2018 नंतर पहिल्यांदाच 10 जून नंतर मान्सूनचा आगमन होणार..! अर्थात यंदा अलनिनोचीही स्थिती..!

June 6, 2023

हायवेच्या कडेला फक्त त्या उभ्या होत्या; एवढाच त्या दोघींचा दोष! आनेवाडीच्या टोलनाक्यापुढे टॅंकर अचानक काळ बनून आला! दोघी तर गेल्याच; एक मुलगीही गंभीर जखमी!

June 5, 2023

शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचल्या! केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांचे प्रतिपादन!

June 5, 2023

मांढरदेवच्या तरुणांचं गावकऱ्यांनी केलं कौतुक! शिवराज्याभिषेक दिन अनोख्या पद्धतीने केला साजरा..!

June 5, 2023

आता काही खैर नाही.. इंदापूर तालुक्यात पाणी ठरणार भाजप – राष्ट्रवादीत राजकीय संघर्षाची ठिणगी.. हर्षवर्धन पाटलांनी नेमकं काय मागितलं?

June 5, 2023

बारामती तहसील कार्यालयाच्या आवारात इंदापूरातील शेतकऱ्याने जमीन वादातून घेतले पेटवून!

June 5, 2023

बारामतीकर मोईन बागवान आणि स्वराज वाबळे यांची महाराष्ट्र प्रीमियम लीगच्या लिलावासाठी निवड

June 5, 2023

पाटस – दौंडसह पुणे – सोलापूर महामार्गालगत उभारलेले बेकायदा धोकादायक लोखंडी होर्डिंग हटवा!

June 5, 2023

बालासोर चा रेल्वे अपघात! अपघात नसून घातपात? कुणी केला अपघात? त्याचा सिग्नल केंद्र सरकारला कळाला! आता सीबीआय चौकशी होणार!

June 5, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group