सोलापूर : महान्यूज लाईव्ह
बार्शी तालुक्यातील पांगरी येथील फटाका स्फोट प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला व पोलीस शोध घेत असलेल्या नाना पाटेकर व युसुफ मणियार या दोघांना पोलीस शोधत होते. त्यातील मणियारला पोलिसांनी अटक केली, मात्र प्रमुख आरोपी नाना पाटेकर हा मात्र पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
नाना पाटेकर हा महाराष्ट्रातून पळून जाऊन तामिळनाडूत शिवकाशी येथील आश्रयाला पोहोचला होता. मात्र सोलापूर जिल्हा पोलिसांनी तपासाची शर्थ केली आणि नाना पाटेकरला शिवकाशी येथून ताब्यात घेतले.
नाना पाटेकर आणि युसुफ मणियार हे दोघेजण या पांगरी येथील पोटाच्या प्रकरणातील फटाका कारखान्याचे मालक व भागीदार होते. उस्मानाबाद शहरातील गणेशनगर येथे राहणारा नाना पाटेकर हा पोलिसांना गुंगरा देण्यात यशस्वी झाला, मात्र पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी त्याची प्रवासाची व तो जिथे जिथे जाईल तेथील तांत्रिक बाबींचा तपास करत त्याच्यावर नजर ठेवली.
नाना पाटेकर हा सोलापूर अथवा कर्नाटक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तिथेही पोहोचले. मात्र तेथूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर गोपनीय बातमीदारांच्या व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी नाना पाटेकर हा महाराष्ट्र सोडून तामिळनाडूच्या हद्दीत पोहोचला असल्याची माहिती मिळवली आणि तेथे वेशांतर करून पोलीस काही दिवस राहिले.
अखु त्यांनी शिवकाशी येथून नाना पाटेकरला ताब्यात घेतले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरी या फटाक्याच्या कारखान्यात काही दिवसांपूर्वी आग लागली आणि त्याच्या स्फोटामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात हे मुख्य आरोपी जबाबदार आहेत.
नाना पाटेकर याला अटक करण्यात आली असून बार्शी न्यायालयाने त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नाना पाटेकरला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक निरीक्षक धनंजय पोरे, श्रीकांत गायकवाड, हरिदास पांढरे, समर्थ गाजरे, सलीम बागवान, दिलीप थोरात आदींच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली या गुन्हेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे करत आहेत.