दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्याच्या आणि मुंबईच्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.
कोणी कोणाबरोबर युती करावी, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते दोघे एकत्र आले म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले असे म्हणता येत नाही. कारण यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती महायुतीत भाजपसोबत एकत्र आलेले आहेत आणि त्यावेळी आम्ही भरपूर जागाही जिंकलेल्या आहेत.
त्यामुळे त्याचा परिणाम यापूर्वी समोर दिसून आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन युतीचा राज्याच्या राजकारणावर काही फरक पडणार नाही असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाई येथे सांगितले.
महाबळेश्वर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे एक दिवसीय अभ्यास शिबिर महाबळेश्वर येथे होत आहे .या शिबिरासाठी जात असताना वाई येथे साताराचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ते पर्याय शोधत आहेत आणि म्हणून त्यांनी वंचितशी युती केली आहे .परंतु महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती पूर्वीपासून कार्यरत आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या कोणत्याही युतीचा शिवशक्ती भीमशक्ती युतीवर कोणताही परिणाम होणार नाही.
आंबेडकरी अनुयायांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कोणतीही अस्वस्थता नाही. या अस्वस्थतेचा परिणाम आमच्या पक्षावर होणार नाही. आमचा पक्ष ज्या बाजूला असेल त्या बाजूला सत्ता असते हे अनेक वर्षाचे गणित आहे. यावेळी मुंबई महापालिकेमध्ये भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची सत्ता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देश खऱ्या अर्थाने विकासाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्यासोबत आहेत असेही ते म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका रिपब्लिकन पार्टीने व्यापक केली आहे. त्यासाठी यापुढे कोणती भूमिका असायला हवी, यासाठी महाबळेश्वर येथे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचे शिबिर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट: अशोक गायकवाड यांना पक्षातील जेष्ठतेचा विचार करता मंञी मंडळ विस्तारात स्थान देणार: