सोलापूर – महान्यूज लाईव्ह
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा लागू होऊन एवढी वर्षे उलटली, तरी चोरून चोरून या कायद्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याच जात आहेत.. त्यामुळे मुलींचा दुष्काळ पडू लागला आहे. लग्नाचे वय उलटून गेले, तरी मुलगी लग्नासाठी मिळत नाही, म्हणून सोलापूरात अशा लग्नाळू नवरदेवांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच साकडे घातले.. त्यासाठी निघालेल्या मोर्चाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह युट्युब चॅनेल अथवा फेसबुक पेजवर पाहू शकता
सोलापूरात ज्योती-क्रांती संघटनेने हा अभिनव मोर्चा आयोजित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या या मोर्चाची राज्यात चर्चा झाली. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ती अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हा अभिनव मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनाने संपूर्ण राज्यातील माध्यमांचे लक्ष वेधून घेतले असले आणि सामान्य नागरिकांमध्ये या अभिनव आंदोलनाची चर्चा होत असली तरी शासनाचे डोळे यातून उघडणार का? हा खरा प्रश्न आहे. कारण अजूनही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गर्भलिंग निदान अनेक ठिकाणी होतच आहे. त्याला प्रतिबंध घातला जात नाही, तोवर लिंग गुणोत्तराचे प्रमाण असमानच राहणार आहे.