लग्न कसलं.. सतराशेसाठ विघ्नच.. नवरदेवाला हळद लागली नाही, तोच लग्नाच्या मंडपाने घेतले ५ दिवसांत ३१ जणांचे जीव..दररोज कोणी ना कोणी मरतोय..!

शेरगड – महान्यूज लाईव्ह

लग्न म्हणजे साताजन्माच्या गाठी.. लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरवात… मात्र राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील शेरगढ तालुक्यातील भूंगरा गावात सध्या दररोज आकांत ऐकू येतोय… तेथील लग्नघरी दररोज कोणी ना कोणी मेल्याची बातमी येतेय..

लग्नसोहळ्यात नवरदेवाच्या विवाहाअगोदर संगीताचा कार्यक्रम होता. घरात २० सिलेंडर होते. अचानक एका सिलिंडरमधून वास .येऊ लागला आणि काही कळण्याच्या आत सिलेंडरचे एकामागोमाग स्फोट सुरू झाले. मंडपातील सर्वच लोक या सिलिंडरच्या स्फोटात सापडले. तब्बल ६० जण गंभीर जखमी झाले..

आता यातील जखमींवरील उपचारादरम्यान दररोज कोणी ना कोणी मृत्यू पावल्याची बातमी या गावात येऊन धडकत आहे. फक्त पाच दिवसांतच या गावातील लग्नघरातील ३१ नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.

भुंगरा गावातील सुरेंद्रसिंह याचा विवाह होता. मात्र या विवाह सोहळ्यासाठी आयोजित केलेल्या लग्नमंडपात नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केलेल्या ठिकाणी गॅससिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात सुरेंद्रसिंह याचे आईवडीलही मृत्यू पावले. त्याचवेळी अनेकजण गंभीर जखमी झाल्याने या परिसरात हल्लकल्लोळ माजला होता.

त्यानंतर महात्मा गांधी रुग्णालयात यातील जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्यांच्या मृत्यूच्या बातमीने दररोज गावाचा दिवस उजाडतोय आणि नवरदेव सुरेंद्रसिंहच्या घरी फक्त आकांत ऐकू येतो. गेल्या पाच दिवसांपासून हे सुरू आहे.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago