• Contact us
  • About us
Thursday, February 9, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता बास झालं.. कारखान्याच्या उत्पन्नानुसार उसाला प्रतिटन 3 ते 4 हजार रुपये दर मिळालाच पाहिजे! रयत क्रांती संघटनेची नवी हाक!

Maha News Live by Maha News Live
October 11, 2022
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0

दौंड : महान्यूज लाईव्ह

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उपपदार्थ निर्मिती न करणाऱ्या साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन 3000 रुपये दर द्यावा व साखरेसोबतच उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांनी प्रति टन ऊसाला 4000 रुपये द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटने निवेदनाद्वारे साखर आयुक्तांकडे केली आहे.‌

यासंदर्भात रयत क्रांती संघटनेच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने व न्यायालयीन लढा दिल्यानंतर ऊस उत्पादकांना आर्थिक न्याय मिळाला आहे. सन २००१ ते सन २०१५ अशा पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर पूर्वीची एसएमपी व आत्ताची एफ आर पी एक रक्कमी मिळण्यास ऊस उत्पादक व शेतकरी संघटना यांना यश आले आहे.

शिवाय उसावरील झोनबंदी उठवणे व ऊस बिलातून होणारी बेकायदेशीर कपाती परतीची ठेव, बिन परतीची ठेव, साखर संकुल निधी, मुख्यमंत्री निधी, भूकंप निधी, अशा बेकायदा वसुली सुद्धा मोठ्या संघर्षानंतर बंद झाल्या आहेत. सन २०१९ नंतर पुन्हा एकदा साखर कारखानदार एक रक्कमी एफ आर पी व आर एस एफ देण्यात टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी व संघटना यांच्यामध्ये संघर्ष आंदोलने होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

एफ आर पी व आर एस एफ पैकी जी रक्कम जास्त असेल ते देणे व ती कायदेशीर एकरकमी १४ दिवसाच्या देणे बंधनकारक आहे. त्यामुळे चालू गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाची एफ आर पी व आर एस एफ न देणाऱ्या साखर कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करून शेतकऱ्यांचे देणे देण्यात यावे. उसाच्या रिकव्हरीनुसार निघणारी कारखाना निहाय एफ आर पी हा काही उसाचा अंतिम बाजार भाव नाही.

कारण आरएसएफ प्रमाणे महसूल उत्पन्नातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. साखर निर्मिती सोबत साखर कारखानदार आता वेगवेगळ्या उप पदार्थाची निर्मिती करतात. साखर,बगॅस, को-जन, डिस्लरी, इथेनॉल, बी हेवी मळी, सॅनिटायझर असे उपपदार्थ निर्मिती मधून मिळणारे आर्थिक उत्पन्नातील वाटा कारखानदार शेतकऱ्यांना देत नाहीत. त्यामुळे उपपदार्थ निर्मिती न करणारे व उपपदार्थ निर्मिती करणारे साखर कारखान्यांची वर्गवारी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा बाजार भाव मिळावा.अशी मागणी
रयत क्रांती पक्षाच्या वतीने केली.

याबाबत पुणे साखर संकुल कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक पगार, शिवनाथ जाधव, भानुदास शिंदे, दीपक भोसले, सुहास पाटील, अजय बागल, सूर्यकांत काळभोर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post

गोरगरिबांसाठीच्या मराठी शाळा बंद करुन शिक्षण सम्राटांनाच मोठे करायचे काय ? गोरगरिबांच्या शिक्षणाशी खेळाल तर परिणाम वाईट होतील..! अनिता खरात यांनी दिला आंदोलन करण्याचा इशारा.!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिग ब्रेकींग – दौंडच्या सामूहिक हत्याकांडात एवढ्या लोकांचा होता सहभाग..! आता पोलिस घेणार विशेष सरकारी वकीलांची मदत! गुन्ह्यातील हत्यारे केली जप्त!

February 8, 2023

मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाही बारामतीची भुरळ.. कृषिक प्रदर्शनाबरोबर बारामतीची कृषीपंढरी पाहण्यासाठी आज बारामतीत..

February 8, 2023

लोणार काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात स्टेट बँकेसमोर धरले धरणे..!

February 7, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्तांना मदत.!

February 7, 2023

वरवंडला ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत केली निर्घृण हत्या!

February 7, 2023

पुणे जिल्ह्यातील घटना! भाचा नालायक निघाला.. मामाची पोरगी घेऊन पळून गेला.. पण मामा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नीच निघाला.. भाच्यावर राग होता, म्हणून काय दोन भाचींना विवस्त्र करून रस्त्यात मारहाण करायची काय?

February 7, 2023

महावितरणने नव्याने वीज दरवाढ लादल्यास उद्योजक आंदोलन करणार! बारामतीत धनंजय जामदार यांचा इशारा!

February 6, 2023

ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली होताच पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात हॉटेल आणि लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय!

February 6, 2023
नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

February 6, 2023

स्वराज्य सेनानी नरवीर तानाजी मालुसरे.. इतिहासात अजरामर झालेले काय होते हे अजब रसायन?

February 6, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group