• Contact us
  • About us
Wednesday, February 8, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईबाबा.. अन गुरूजींची शपथ.. अजाबात टेन्शन घेऊ नका.. आता दुसरीपासून नाही, मात्र तिसरीपासून परीक्षा सुरू होईलच.. फक्त थोडी कळ काढा…!

tdadmin by tdadmin
October 7, 2022
in सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्रिडा, राज्य, व्यक्ती विशेष, Featured
0

मुंबई- महान्यूज लाईव्ह

आठवीपर्यंत परिक्षा नाही, त्यामुळं पोरं नापास होत नाहीत.. मग शाळाही निवांत आणि आईबापही निवांत…मग पोरं नववीत गेल्यावर वाचायलाही येत नाही… अशी जी चर्चा सध्या सगळीकडे होत आहे, त्याची कुठेतरी दखल शिंदे सरकारने घेतली आहे असे दिसते.. कारण आज दिपक केसरकर यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. शिक्षणतज्ज्ञांशी सरकार चर्चा करीत असून त्यातील अंतिम निर्णयानुसार तिसरीपासून परिक्षा सुरू करण्याचे सरकारच्या मनात असल्याचे समजते.

आज शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकरांशी पुण्यात बोलताना याविषयीचे संकेत दिले. तिसरीपासून परीक्षा सुरू करण्याचे सरकारच्या मनात आहे, मात्र शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत परीक्षाच होत नसल्याने आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाही, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिसरीपासून परीक्षा सुरू करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.

सर्वांना विचारात घेऊनच याविषयीचा निर्णय होईल, मात्र याचा अर्थ म्हणजे तिसऱीपासूनच पुन्हा नापासांची पातळी गाठली जाणार किंवा परीक्षेत नापास म्हणजे तिसरीत नापास असा याचा अर्थ काढता येणार नाही असे संदिग्ध उत्तरही केसरकर यांनी दिले आहे.

गृहपाठ बंद करावा असे मला वाटत नाही. फक्त गृहपाठ कोणत्या वर्गापासून द्यावा याचा विचार व्हायला हवा. कारण अगदी बालवाडीपासूनच मुले शाळेतही लिहीतात आणि घरीही लिहीतात. खरेतर शिक्षकांची जबाबदारी ही पुस्तकापलीकडची आहे. मुलांना शिकवणी लावण्याची वेळ आलीच नाही पाहिजे. मुलांनी खेळलेही पाहिजे याकडे लक्ष देण्याची आता आवश्यकता असल्याचे मत केसरकर यांनी व्यक्त केले.

अर्थात गेल्या काही दिवसांतील शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांचा विचार करता, या अत्यंत महत्वाच्या मुद्दयावरही सरकार नेमका काय निर्णय घेते याची मात्र उत्सुकता आहे.

Next Post
यवत, सासवड,जेजुरी पोलीसांच्या हद्दीत चारचाकी गाड्यांचे महागडे सायलन्सर चोरी करायचे..यवत पोलिसांनी दोन लाखांच्या मुद्देमालासह टोळी केली जेरबंद..

यवत, सासवड,जेजुरी पोलीसांच्या हद्दीत चारचाकी गाड्यांचे महागडे सायलन्सर चोरी करायचे..यवत पोलिसांनी दोन लाखांच्या मुद्देमालासह टोळी केली जेरबंद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिग ब्रेकींग – दौंडच्या सामूहिक हत्याकांडात एवढ्या लोकांचा होता सहभाग..! आता पोलिस घेणार विशेष सरकारी वकीलांची मदत! गुन्ह्यातील हत्यारे केली जप्त!

February 8, 2023

मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाही बारामतीची भुरळ.. कृषिक प्रदर्शनाबरोबर बारामतीची कृषीपंढरी पाहण्यासाठी आज बारामतीत..

February 8, 2023

लोणार काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात स्टेट बँकेसमोर धरले धरणे..!

February 7, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्तांना मदत.!

February 7, 2023

वरवंडला ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत केली निर्घृण हत्या!

February 7, 2023

पुणे जिल्ह्यातील घटना! भाचा नालायक निघाला.. मामाची पोरगी घेऊन पळून गेला.. पण मामा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नीच निघाला.. भाच्यावर राग होता, म्हणून काय दोन भाचींना विवस्त्र करून रस्त्यात मारहाण करायची काय?

February 7, 2023

महावितरणने नव्याने वीज दरवाढ लादल्यास उद्योजक आंदोलन करणार! बारामतीत धनंजय जामदार यांचा इशारा!

February 6, 2023

ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली होताच पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात हॉटेल आणि लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय!

February 6, 2023
नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

February 6, 2023

स्वराज्य सेनानी नरवीर तानाजी मालुसरे.. इतिहासात अजरामर झालेले काय होते हे अजब रसायन?

February 6, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group