विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामतीत पंतप्रधान आले त्यांचही आम्ही स्वागत केलं.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन,चंद्रशेखर बावनकुळे आले तरी त्यांचही स्वागतच आहे.कोणीही यावं बारामती करांना येऊन भेटावं.गेली ५५ वर्ष झाल आम्ही हेच बगतोय.अनेक जण येतात.अनेक जण भेटतात,अनेक जण जातात.बारामतीकर त्यांना जे हव ते करतात.अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काहींना केवळ टेंडर काढण्यातच रस असतो.शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत.असा आरोप केला होता.याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की सध्या बारामतीत जी विकास कामे चालू आहेत.ते टेंडर काढण्यात रस आहे म्हणून चालली आहेत काय.बाहेरच्या व्यक्तीने येऊन उचलली जीभ लावली टाळ्याला हा जरी त्यांचा अधिकार असला तरी त्याला किती महत्त्व द्यायचं हा बारामतीकरांचा अधिकार आहे.बारामतीकर मला पहिल्यापासून ओळखतात.मी ज्या दिवशी बारामतीचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे.तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही कामाच्या टेंडरमध्ये पाच पैशाचाही मिंधा नाही अस अजितदादांनी बारामतीमध्ये सांगितल.
तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अनेक नेते मंत्री भेटत आहेत.याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, आपण अनेकांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो ही आपली भारतीय संस्कृती आहे.यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही उलट आनंद आहे. मी आणि राज ठाकरे अनेकदा भेटलो आहे. राजकीय मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे वैरी नाहीत.मित्रत्वाचे संबंधही असू शकतात.असंही अजित पवार म्हणाले.