• Contact us
  • About us
Thursday, February 9, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला ब्रेक! डावे- उजवे प्रश्न मात्र अनुत्तरितच!

Maha News Live by Maha News Live
August 21, 2022
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर बारामती शहरातील सुशोभीकरणाच्या माध्यमातून हे अस्तरीकरण पूर्ण झाले आणि त्यानंतर जेव्हा ग्रामीण भागात याला सुरुवात झाली, तेव्हा हळूहळू शेतकऱ्यांमध्ये विरोध सुरू झाला. आपल्या विंधन विहिरी आणि कालव्याच्या कडेच्या विहिरी यांचे पाणी जाईल आणि पुन्हा आपला भाग ओसाड होईल म्हणून शेतकरी एकवटले आणि त्याला हळूहळू राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू झाला. याची कुणकूण लागताच आता निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला तूर्तास ब्रेक देण्यात आला आहे.

या संदर्भात जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील हे काम थांबवण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान हे काम थांबवल्याने हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे काही जण म्हणतील देखील; परंतु यामुळे अनेक भविष्यातील प्रश्न अनुत्तरीत राहिले आणि राहणार आहेत.

कालव्याच्या अस्तरीकरणाला गेल्या दोन ते तीन महिन्यापासून विरोध सुरू झाला. सुरुवातीच्या काळात याकडे कोणाचे लक्ष नव्हते, मात्र जसे जसे अस्तरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तसे तसे शेतकरी अस्वस्थ होत गेले. पणदरे येथे या आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्याचे लोण इंदापूर व बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी पोचले. कन्हेरी, कोऱ्हाळे बुद्रुक तसेच इंदापूर तालुक्याच्या विविध भागात देखील या संदर्भात बैठका झाल्या आहेत.

निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर वर्षानुवर्षी कालव्याच्या वितरिकेवर अवलंबून असणारे शेतकरी या निर्णयाने सुखावले होते तर कालव्याच्या कडेला एक- दोन गुंठे, चार गुंठे जमिनी घेऊन ज्यांनी तेथे विहिरी खोदून पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावरील इतर गावांमधील आपली शेती बागायती केली असे शेतकरी मात्र अस्वस्थ झाले होते.

त्याचबरोबर ज्यांच्या जमिनी या कालव्यासाठी संपादित झाल्या, ते कालव्याच्या कडेचे शेतकरी देखील या निर्णयामुळे अस्वस्थ झाले होते. बारामती शहरातून अस्तरीकरण होत असताना काही ठिकाणच्या विंधन विहिरींचे पाणी गेले अशा प्रकारची ओरड काही जणांनी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या या अस्वस्थतेला अधिक स्वरूप आले‌. त्याला उग्र स्वरूप देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी एकत्र आले.

गेल्या काही दिवसात बारामती आणि इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी याच्या बैठका सुरू झाल्याने हे आंदोलन उग्र आणि तीव्र स्वरूप धारण करेल याची कुणकूण लागताच राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील यामध्ये हस्तक्षेप केला आणि हे अस्तरीकरणाचे काम तूर्तास थांबवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे काम सध्या थांबवण्यात आले आहे.

अस्तरीकरणामुळे निरा डाव्या कालव्याच्या कडेच्या भागात पाझरामुळे होणारा फायदा संपेल आणि ज्या कालव्याच्या कडेच्या जमिनी बागायती झाल्या आहेत, त्या ओसाड होतील ही शेतकऱ्यांची भीती अगदीच निराधार नाही. कारण बारामती व इंदापूर तालुक्याचा बहुतांश भाग हा तसा पाहिल्यास कमी पर्जन्याचा भाग आहे. त्यामुळे या भागात पाण्याचे जिवंत स्त्रोत कोणालाही नाहीत.

कालव्याच्या पाण्यावरच अवलंबून असणारी हजारो हेक्टर शेती आणि त्यामुळे उसाच्या उत्पादनात झालेली वाढ हे येथील अर्थकारणाचे प्रमुख चक्र आहे. कालव्याच्या अस्तरीकरणाचा फायदा शेवटच्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत होईल, परंतु यामुळे जे शेतकरी सध्या ऊर्जितावस्थेत आहेत, त्यांची मात्र वाट लागेल. म्हणून या शेतकऱ्यांचा विरोध वाढला होता.

आता हे शेतकरी शांत होतील, परंतु अस्तरीकरणाच्या निर्णयामुळे ज्यांना फायदा होऊ शकला असता व आवर्तनाचा कालावधी कमी होऊन वेळेवर व पुरेसे पाणी मिळाले असते, असे शेतकरी आता नव्याने आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण जेव्हा या अस्तरीकरणाला विरोध सुरू झाला, तेव्हाच अस्तरीकरण हवे असे म्हणणाऱ्यांचा गट देखील प्रभावी बनत गेला आहे. विशेषतः इंदापूर तालुक्यात आणि बारामती तालुक्यात वितरिकेवर अवलंबून असणारे शेतकरी अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर सकारात्मक होते, केवळ अस्तरीकरण नसल्यामुळे व पाझर जास्त झाल्यामुळे आणि पाण्याची चोरी जास्त होत असल्यामुळे या वितरिकेवरील अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नव्हते.

ते पाणी व्यवस्थितरित्या मिळेल अशी या शेतकऱ्यांना खात्री आहे. त्यामुळेच अस्तरीकरणाला विरोध करणारा एक गट आणि अस्तरीकरणाचे समर्थन करणारा एक गट अशा दोन गटांची स्पर्धा येत्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात शेतकऱ्यांच्या या मुद्द्याचे भावनिक राजकारण करून त्याला उग्र स्वरूप देत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न देखील या आंदोलनाच्या माध्यमातून होणार होता. या सर्वांची कुणकुण लागल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील यात हस्तक्षेप करून हे अस्तरीकरण सध्या थांबवले असल्याचे सांगितले जात आहे.

Next Post

भरणेमामांच्या गावातीलच हा कलाकार म्हणतोय, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! थेट राज्यपालांकडे केली आमदार होण्याची इच्छा व्यक्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिग ब्रेकींग – दौंडच्या सामूहिक हत्याकांडात एवढ्या लोकांचा होता सहभाग..! आता पोलिस घेणार विशेष सरकारी वकीलांची मदत! गुन्ह्यातील हत्यारे केली जप्त!

February 8, 2023

मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाही बारामतीची भुरळ.. कृषिक प्रदर्शनाबरोबर बारामतीची कृषीपंढरी पाहण्यासाठी आज बारामतीत..

February 8, 2023

लोणार काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात स्टेट बँकेसमोर धरले धरणे..!

February 7, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्तांना मदत.!

February 7, 2023

वरवंडला ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत केली निर्घृण हत्या!

February 7, 2023

पुणे जिल्ह्यातील घटना! भाचा नालायक निघाला.. मामाची पोरगी घेऊन पळून गेला.. पण मामा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नीच निघाला.. भाच्यावर राग होता, म्हणून काय दोन भाचींना विवस्त्र करून रस्त्यात मारहाण करायची काय?

February 7, 2023

महावितरणने नव्याने वीज दरवाढ लादल्यास उद्योजक आंदोलन करणार! बारामतीत धनंजय जामदार यांचा इशारा!

February 6, 2023

ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली होताच पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात हॉटेल आणि लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय!

February 6, 2023
नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

February 6, 2023

स्वराज्य सेनानी नरवीर तानाजी मालुसरे.. इतिहासात अजरामर झालेले काय होते हे अजब रसायन?

February 6, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group