शिरूर : महान्यूज लाईव्ह
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित चव्हाणवाडी (ता.शिरूर) येथे ७५ जणांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडला असल्याची माहिती सरपंच संतोष लंघे यांनी दिली.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून सर्वत्र साजरे केले जात आहे. या निमित्ताने चव्हाणवाडी ग्रामपंचायतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. इंदापूर येथील मुक्ताई ब्लड बँकेने यासाठी विशेष सहकार्य केले. या आयोजित केलेल्या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदविला.
या प्रसंगी डॅा उमेश कणकवलीकर,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील,पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, करडेचे माजी सरपंच गणेश रोडे, माजी सरपंच किरण चव्हाण, सोसायटीचे चेअरमन संदिप लंघे, महेंद्र जासुद, माजी चेअरमन चद्रंकात वाळके, करडे गावचे सरपंच सुनिल इसवे, उपसरपंच गणेश वाघमारे यांसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच संतोष लंघे यांनी सांगितले की, चव्हाणवाडी ग्रामपंचायतीने या अमृतमहोत्सव दिनी गावातील सर्व आजी माजी सैनिक यांना निमंत्रण देऊन त्याचा गौरव केला असून रक्तदान शिबिर आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य निलेश लोखंडे, वाल्मिक लंघे यांनी केले तर आभार संतोष लंघे,उपसरपंच अक्षय बांदल यांनी मानले. दरम्यान ग्रामसेवक विकी पोळ यांनी शासनाच्या योजनांची माहीती दिली. याप्रसंगी चव्हाणवाडीचे माजी उपसरपंच वैभव जगदाळे, स्वाती हराळे, ग्रा प सदस्या प्रभावती गरुड, ग्रा प सदस्या जयश्री लोखंडे, ग्रा प सदस्या सर्व कर्मचारी जि प शिक्षक अगंणवाडी सेविका आणि तसेच सर्व विद्यार्थी वर्ग आणि गावातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. गावातील हा कार्यक्रम पाहून माजी सैनिक अक्षरशः भारावून गेले.