• Contact us
  • About us
Thursday, February 9, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरात सामान्य माणसाची सरकारी गेंड्यांविरोधात १६ वर्षांच्या, २०६ पानांच्या संयमी, कायदेशीर लढ्याची गांधीगिरी..! २००६ ते २०२२..! पण शेवटी ४ ग्रामसेवक, २ विस्तार अधिकारी, १ माजी सरपंच, २ वकील कामाला लागले… इंदापूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल..!

tdadmin by tdadmin
August 18, 2022
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आर्थिक, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह

सत्य परेशान हो सकता है… पराजित नही.. इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी क्रमांक १ मधील सामान्य व्यक्तीने प्रशासकीय कामकाजातील जाणीवपूर्वक चुका व भ्रष्ट मनमानीविरोधात तब्बल १६ वर्षे सनदशीर लढा दिला. अखेर पोलिसांना ग्रामपंचायतीतील भ्रष्ट प्रवृत्तीची दखल घ्यावीच लागली. इंदापूर पोलिसांनी एका मृत व्यक्तीसह १४ जणांविरोधात गु्न्हा दाखल केला असून यामध्ये तब्बल ६ शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत.

या लढ्याची सुरवात २००६ मध्ये झाली. गावातील हनुमंत वसंत कदम यांनी हा लढा दिलाय. यावरून इंदापूर पोलिसांनी तत्कालीन विस्ताराधिकारी जी.एम. दराडे, प्रशांत बगाडे, या काळातील सरपंच केशर उत्तम जाधव, तेव्हापासूनचे ग्रामसेवक फिरोजखान पठाण, व्ही.एस. साळुंखे, ए.एन. शेंडे, श्रीमती आर.बी. पर्वते या प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

तर कदम यांच्याच फिर्यादीवरून इंदापूरातील वकील राजेंद्र शंकर सोमवंशी, पृ्थ्वीराज राजेंद्र सोमवंशी, जयश्री राजेंद्र सोमवंशी, शरद ज्ञानदेव कदम, भारत शंकर सोमवंशी, कै. भगवान मारुती कदम, गणेश भिवाजी जाधव यांच्याविरोधातही फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, हनुमंत कदम हे गलांडवाडी नंबर १ मधील रहिवाशी आहेत. त्यांचे वडील वसंत संभाजी कदम यांच्या नावाने गावात मिळकत होती. संबंधित वकील व त्यांच्या नातेवाईकांची या मिळकतीशेजारी मोठी इमारत आहे. हनुमंत कदम यांची जागा बळकावून हाकलून देण्यासाठी कदम यांना बेदम मारहाण करण्यात आली अशी कदम यांची तक्रार होती. शरद कदम यास पुढे करून राहत्या जागेमधून जबरदस्तीने रस्ता करण्यासाठी दिवाणी कोर्टात दावा दाखल करायला लावला.

तर त्यानंतर कदम यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी माणिक बिचकुले यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा तत्कालीन विस्तार अधिकारी जी.एम. दराडे याने कदम यांच्या अपरोक्ष जुजबी चौकशी करून कदम यांची बखळ जागा नसल्याचा, त्या जागेतून १२ फूट रस्ता असल्याचे व मिळकतीमध्ये खाडाखोड असल्याचा अहवाल दिला आणि येथूनच कदम यांच्या संघर्षाला सुरवात झाली.

दराडे यांच्या चुकीच्या अहवालामुळे कदम यांना सातत्याने फौजदारी व दिवाणी खटल्यांना व गुन्ह्यांना सामोरे जावे लागले. माणिक बिचकुले यांनीदेखील दराडे याचा हा अहवाल मान्य केला. सन २०१४ मध्ये शरद कदम व संबंधितांनी ग्रामसेवक फिरोजखान पठाण याच्याशी संगनमत करून २००६-०७ च्या कर आकारणी रजिस्टरला मिळकतीत ३५२ चौरस फूटाची नोंद केली. त्यानंतर दीड गुंठे जागा व ३५२ चौरस फूट अशी नोंद वाढवली.

त्यामुळे सोमवंशी कुटुंबियांनी आपल्या जागेत अतिक्रमण केल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. त्यानंतर अश्विनी नारायण झेंडे या तत्कालिन ग्रामसेविकेने पुन्हा २००६-०७ च्या मिळकत रजिस्टरला बनावट नोंद करून २०१२ मध्ये २७६८ चौरस फूटाचा उतारा तयार केला व ती जागा भगवान मारुती कदम यांच्याकडीन खरेदी करून त्यामध्ये इमारत बांधून ती पांडूरंग फलफले यांना विक्री केली.

एकाच मिळकतीतील जागा ३५२ चौरस फूटावरून वेळोवेळी वाढवत ती २७६८ चौरस फूटापर्यंत नेली आणि त्यातून शासनाची वेळोवेळी फसवणूक करण्यात आल्याची तक्रार कदम यांनी केली होती. त्यानंतर कदम हे २०१४ पासून सातत्याने शासनाशी संघर्ष करीत होते.

भगवानचा जन्म १९३६ चा आणि जागेची नोंद मात्र १९३३ची…!

याच गावातील आणखी एक गंमत म्हणजे तत्कालीन ग्रामसेवक व्ही.एस. साळुंखे यांनी कै. भगवान कदम व भारत सोमवंशी यांचा फायदा व्हावा या हेतूने मूळ मिळकत ५५० चौरस फूटाची असताना खोटा दस्त बनवून गावठाणातील अकृषी महसूली नोंदवहीत या जागेची तब्बल १० गुंठे नोंद केली. विशेष म्हणजे ही नोंद करताना ती १० जानेवारी १९३३ मध्ये भगवान कदम यांच्या नावे केली.

मात्र गंमतीचा भाग असा की, भगवान यांचा जन्मच मुळी १५ ऑक्टोबर १९३६ रोजी झालेला असल्याचे शाळेच्या दाखल्यावर नोंदीत असल्याने कदम यांनी याचीही माहिती शासनास म्हणजे गटविकास अधिकाऱ्यास दिली होती. मात्र तेथेही कदम यांचे म्हणणे कोणीच ग्राह्य धरले नाही. त्यामुळे गावातील नियमबाह्य कामे, आर्थिक गैरव्यवहार याविषयी हनुमंत कदम सातत्याने शासनाशी सनदशीर मार्गाने लढा देत होते.

गुन्हा दाखल, मात्र पुढे काय?

अर्थात कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा तर दाखल झाला आहे. अर्थात ग्रामपंचायतीच्या स्तरावर होत असलेल्या अशा चुकीच्या गोष्टींचा प्रत्यक्ष सामना करताना स्थानिक स्तरावर सामान्य नागरिकांना फार त्रास होतो. एखादाच वसंत कदम तयार होतो आणि तो व्यवस्थेशी लढतो. आता देखील गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले आहे.

मात्र जेवढी तत्परता इतर गुन्ह्यांमधील तपासासाठी पोलिस दाखवतात, तेवढी तत्परता याही गुन्ह्यात दाखवतील का? हा प्रश्नच आहे. पोलिसांनी जर या प्रकरणात प्रामाणिकपणे व तत्परतेने आरोपींना जेरबंद करण्याची भूमिका घेतली, तरच सामान्यांचा व्यवस्थेवर विश्वास राहील..

अन्यथा पुन्हा आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी १६ वर्षे लढण्याची तयारी कदम यांना दाखवावी लागेल.. थोडक्यात एका गावातील चुकीच्या व्यवस्थेविरोधात न्याय मागण्यासाठी त्यांना अख्खे आयुष्य घालवावे लागेल..!

Next Post

पाटस ला स्वंतत्र पोलीस स्टेशन होण्यासाठी दौंड चे आमदार राहुल कुल यांची विधानसभेत लक्षवेधी चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बिग ब्रेकींग – दौंडच्या सामूहिक हत्याकांडात एवढ्या लोकांचा होता सहभाग..! आता पोलिस घेणार विशेष सरकारी वकीलांची मदत! गुन्ह्यातील हत्यारे केली जप्त!

February 8, 2023

मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनाही बारामतीची भुरळ.. कृषिक प्रदर्शनाबरोबर बारामतीची कृषीपंढरी पाहण्यासाठी आज बारामतीत..

February 8, 2023

लोणार काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात स्टेट बँकेसमोर धरले धरणे..!

February 7, 2023

आमदार दत्तात्रय भरणेंची अपघातग्रस्तांना मदत.!

February 7, 2023

वरवंडला ज्येष्ठ नागरिकावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत केली निर्घृण हत्या!

February 7, 2023

पुणे जिल्ह्यातील घटना! भाचा नालायक निघाला.. मामाची पोरगी घेऊन पळून गेला.. पण मामा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने नीच निघाला.. भाच्यावर राग होता, म्हणून काय दोन भाचींना विवस्त्र करून रस्त्यात मारहाण करायची काय?

February 7, 2023

महावितरणने नव्याने वीज दरवाढ लादल्यास उद्योजक आंदोलन करणार! बारामतीत धनंजय जामदार यांचा इशारा!

February 6, 2023

ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली होताच पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यात हॉटेल आणि लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय!

February 6, 2023
नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

नऊ महिन्याचं बाळ खेळत होतं.. खेळता खेळता गव्हाच्या पिठात पडलं.. नाकातोंडात पीठ गेलं.. अन बाळानं जगाचा निरोप घेतला..

February 6, 2023

स्वराज्य सेनानी नरवीर तानाजी मालुसरे.. इतिहासात अजरामर झालेले काय होते हे अजब रसायन?

February 6, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group