सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – कळंबच्या मातीने अनेक कबड्डीपटू निर्माण केले. ही माती केवळ इंदापूर तालुक्यालाच नव्हे तर देशालाही आदर्श देते.. आता किरण मगर ची निवड प्रो कबड्डीत झाल्याने इंदापूर तालुक्याचा नावलौकिक देशात वाढला आहे असे मत माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कळंब येथे व्यक्त केले.
किरण याचा सत्कार माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केला. तेव्हा ते बोलत होते. किरणने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही प्रत्येक संकटावर मात करून आपल्या खेळाशी प्रमाणिकपणे राहून प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे त्याला कबड्डीमध्ये उत्तुंग यश प्राप्त करता आले. त्याच्या प्रो. कबड्डी संघातील निवडीने कळंबसह इंदापूर तालूक्याचे नाव देशपातळीवर गेले.
इंदापूर तालुक्यातील कळंबचा सुपुत्र किरण मगर याची विवो प्रो कबड्डी सिजन ९ मध्ये यु मुंबा संघाने ३१ लाख रुपयांची बोली लावून निवड केली. त्याबद्दल राणाप्रताप क्रिडा मंडळ कळंब व पै.संदिप पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी भरणे म्हणाले की, कळंब गावाला कबड्डीची पहिल्यापासून परंपरा आहे. १९७७ पासून कै. गुलाबरावनाना यांच्यापासून चालत असलेली कबड्डीची परंपरा पुढे मधुकर पाटील यांनी चालवली. कबड्डीमध्ये चांगला खेळ दाखवून राज्य, देशपातळीवर विविध पुरस्कार कळंबसाठी आणले व तीच परंपरा किरणसह त्याचे सहकारी पुढे चालवत आहेत हे कौतुकास्पद आहे.
इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला गर्व असून याचा मला व माझ्या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला निश्चितच अभिमान आहे. यापुढील काळात किरणला खेळाच्या दृष्टीने ज्या काही बाबींची गरज असेल, त्यासाठी मी इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या सदैव खंबीरपणे पाठीशी उभा रहाणार असल्याची जाहीर ग्वाही भरणे यांनी दिली.
या कार्यक्रमास कळंब परिसरातील जेष्ठ नेते मधुकर पाटील, रेडणी गावचे सुभाष पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास डोंबाळे पाटील, ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, कळंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब अर्जून, विद्यमान चेअरमन अभिजित खंडागळे, कळंब ग्रामपंचायतीचे सरपंच विद्या सावंत,
चिखलीचे माजी सरपंच शिवाजी अर्जून, घोरपडवाडी गावचे जेष्ठ नेते गजानन लंबाते, सुधीर डोंबाळे, संदिपान चितारे, सोमनाथ घोडके, रमेश कोळी, हनुमंत राऊत, परमेश्वर अर्जून, गोविंद डोंबाळे, गिरीधर खोमणे, दत्तात्रय कोळी, राजेंद्र कोळी, जिलानी शेख, खोरोची गावचे माजी सरपंच संजय चव्हाण, निमसाखर ग्रामपंचायत सदस्य दिपक लवटे,कळंब ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मेटकरी, राजेंद्र डोंबाळे, संदिप पाटील, प्रमोद खंडागळे, सागर कोळी, गणेश चव्हाण, विजय राऊत, राहुल अर्जून, तानाजी कदम,
राजू धारे, संजय कांबळे, दादासो घाडगे, पांडुरंग घाडगे, दादासाहेब डोंबाळे, नितिन जानकर, महेश धायगुडे, रणजित राऊत, सागर राऊत, स्वप्निल मडके, प्रणव पारसे, प्रितम मोहिते, आकाश डोंबाळे, दत्तात्रय चितारे, संदिप डोंबाळे, अशिष डोंबाळे, रवि मगर, प्रतिक कोंडलकर, सचिन गुटाळ, विजय कदम, ऋषिकेश राऊत, रोहित मोहिते, मुकेश शिंदे, धिरज कदम, समाधान गुटाळ, महेश बामणे, महेश बेलपत्रे, दिपक खरात यांच्यासह कळंब ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.