• Contact us
  • About us
Saturday, January 28, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐका.. भारत होणार हिंदूराष्ट्र..? साधुसंतांकडून सुरू आहे नवी ७० पानांची घटना बनविण्याचे काम..! अर्थात ही हवेतली बातमी पेरण्यामागचा हेतू काय?… लोकांची मानसिकता तपासायची आहे का..?

tdadmin by tdadmin
August 13, 2022
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, रोजगार, व्यक्ती विशेष, Featured
0

संपादकीय

सध्या देशात काय सुरू आहे?…. तुम्ही म्हणाल.. आझादी का अमृतमहोत्सव.. हिंदू मुस्लीम वाद… लालसिंग चड्डा स्क्रीनवर कोसळला.. आणि बरेच काही… पण आणखी एक महत्वाची गोष्ट सध्या देशात सुरू आहे.. विशेषतः मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ज्या माध्यमांकडून मोदी सरकारचे सामान्यांना जिकीरीचे ठरतील असेही मुद्दे कसे योग्य आहेत हे चर्वितचर्वण करून सांगितले जाते, त्या माध्यमांकडून एक बातमी पेरली जात आहे, ती म्हणजे भारत हिंदूराष्ट्र होणार याची..! अर्थात म्हटले तर ती बातमी आहे.. ती मुद्दामहून पेरण्याची… जर जनता आक्रसून उठलीच, तर त्यात तथ्य नाही असे सांगण्याचीही तयारी पुढे आहेच..!

सुरवातीला ही बातमी काय आहे ती पाहू… तर बातमी अशी आहे की, भारत हिंदूराष्ट्र घोषित केले जावे यासाठी सन २०२३ मध्ये होणाऱ्या माघी मेळाव्यात हिंदूराष्ट्राची संकल्पना साधूसंतांकडून मांडली जाणार आहे आणि त्या धर्मसंसदेत ती मंजूरही केली जाणार आहे. त्यामध्ये अर्थातच स्वतंत्र घटना असावी असा एक ठराव यापूर्वीच फेब्रुवारी २०२२ मध्ये धर्मसंसदेत मांडला होताच. आता त्याची घटना बनविण्याचे काम सुरू आहे अशी नवी बातमी समोर आली आहे.

ही बातमी अर्थातच तशी सांगोपांगी आहे.. तथाकथित सूत्रांच्या म्हणण्यानुसारची आहे.. मात्र देशातील आघाडीच्या प्रसारमाध्यमांनी यात वाराणसीतील शंकराचार्य परीषदेचे अध्यक्ष स्वामी आनंदस्वरुप यांचा हवालाही दिला आहे. शांभवी पिठाधीश्वरांच्या संरक्षणात ३० साधूसंतांचा समूह या नव्या हिनंदू राष्ट्राच्या घटनेचा मसुदा तयार करत असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान या नव्या हिंदूराष्ट्राची घटनादेखील नवी असणार आहे असे सांगितले जात असून ही घटना ७० पानांची असेल. यात धार्मिक, अध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर काम करीत असलेल्या तथाकथित तज्ज्ञा्ंच्या चर्चेतून ही ७० पानांची घटना ३०० पानांची घटना तयार केली जाणार आहे, अर्थात ती अर्धीच असेल व येणाऱ्या २०२३ मधील मेघमेळ्यात धर्मसंसद होईल, तेव्हा ती अर्धी घटना सादर केली जाईल.

या संभाव्या हिंदूराष्ट्रात सर्व जातींना, धर्मांना राहण्याची सुविधा व सुरक्षा असेल. मात्र इतर धर्मातील नागरिकांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. विशेषतः ख्रिश्चन व मुस्लीमांना मतदान वगळता इतर सर्व अधिकार असतील. वाराणसी म्हणजे श्रीक्षेत्र काशी ही राजधानी असेल. अखंड भारताचा नकाशा असेल. शेतीचे क्षेत्र करमुक्त, प्रत्येकाला सैन्य प्रशिक्षण बंधनकारक असेल. शिक्षण पध्दत गुरूकुल पध्दतीची असेल. आय़ुर्वेद, गणित, ज्योतिष या सगळ्यांचे शिक्षण दिले जाईल.

आता ही झाली बातमी.. ती वरपांगी आहे असे कोणी म्हणाले, तर तेही बरोबर आहे..आणि ती गांभिर्याने घ्यायची आहे असे कोणी म्हणाले, तर तेही बरोबरच आहे. कारण गेल्या काही वर्षात शासनाकडून शासन निर्णय समजत नाहीत, ते शासनापेक्षा सोशल मिडियातून पेरल्या जाणाऱ्या पध्दतशीर बातम्यांमधूनच समोर येतात. अनेक सरकारी निर्णय अगोदर सोशल मिडियात पेरून लोकमताचा अंदाज घेऊन, समाजाची मानसिकता लक्षात घेऊन मग घेतले गेले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे.

त्यामुळे मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ज्या पध्दतीने साधुसंता्ंचे आखाडे सक्रीय झाले आहेत, ते पाहता ही बातमी अगदीच खोटी असेल असे म्हणायलाही धाडस लागेल. अर्थात येत्या काही दिवसांत भारत हिंदूराष्ट्रच कसे व्हायला पाहिजे याच्या बातम्या हळूहळू पध्दतशीर पेरल्या जातील. माध्यमांमधील धार्जिणे संपादक, पत्रकार याची हवा कधी भरेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतील. अशी घटना नसल्याने आपला भारत किती फाजिल लोकशाहीचा झाला आहे हेही पटवून देण्यासाठी स्पर्धा करतील.

हे दिवस फार दूर नाहीत. मात्र समाजातून तीव्र प्रतिक्रिया आताच उमटू लागल्या तर ही लिटमस टेस्ट आटोपती घेतली जाईल. अर्थात काहीही असले तरी विरोधकमुक्त भारत ही स्लोगन ज्या पध्दतीने भारतात रुढ केली गेली, त्याला कोणी विरोध केला नाही, त्यानंतर भाजपचे बडे नेतेही प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाबद्दल थेट बोलू लागले, त्याप्रमाणे या धार्मिक बातमीविषयी कोणत्याच प्रतिक्रिया उमटल्या नाहीत, तर त्याचा पुढील एपिसोडही लवकरच समोर येईल. त्यामध्ये घटना कशी पूर्ण बनलेली आहे, ती कशी उज्वल भारतासाठी महत्वाची आहे, याचे दाखले देण्यासही सुरवात येत्या काळात झालेली असेल.. तो काळही फार दूर नाही.

Next Post

धक्कादायक! उसने पैसे देण्याच्या बहाण्याने घरी येऊन कर्जत तालुक्यातील दोघांनी केला महिलेवर अत्याचार! व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची दिली धमकी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शरद पवारांच्या नास्तिकपणाची चर्चा विरोधकांनी अनेकदा केली.. पण खुद्द शरद पवार आहेत, एका गणेशोत्सव मंडळाचे आजीव सदस्य! ते कोणते मंडळ आहे?

January 28, 2023

दौंड सामूहिक हत्याकांडातील मोठी बातमी! पोलीस महानिरीक्षक फुलारेंनी घटनास्थळाची पाहणी करून सांगितले हे कारण..

January 28, 2023

बारामतीमध्ये कामगारांसाठी शंभर बेडच्या इएसआयसी रुग्णालयाला केंद्राची मंजुरी

January 28, 2023

किसन वीर खंडाळा कारखान्याच्या दुसऱ्या पंधरवड्याचे ऊस बील जमा!

January 28, 2023

२८ हजार तास.. ८ वर्षे.. पूर्ण ओसाड जमीनीवर सहा खंदक खोदले.. पण पाणीच आणले.. आज तिथं बागांचं नंदनवन आहे.. सरकारने त्यांना पद्मश्री दिलाय..!

January 28, 2023

पोट फुगून फुटेल एवढा पगार आहे, तरीही नाही वालचंदनगरच्या हवालदाराला लाज! शेतकऱ्याकडून मागितली दहा हजाराची लाच!

January 28, 2023

अमिताभ बच्चनची लेक बारामतीत! पवार कुटुंबियांनी केलं स्वागत

January 28, 2023

दुर्दैवाचे दोन वार..दोन दिवसांत सात जण धडकले.. पाच जण जगातून गेले.. तीन जण कायद्याच्या कचाट्यात अडकले..!

January 28, 2023
निरा भीमा कारखान्याच्या चौकात ट्रॅक्टरचालक वाचवा..वाचवा म्हणत राहीला.. २६ जानेवारी रोजीचा हा हल्ला पाहून दुकानदारही दुकाने बंद करून पळाले..

निरा भीमा कारखान्याच्या चौकात ट्रॅक्टरचालक वाचवा..वाचवा म्हणत राहीला.. २६ जानेवारी रोजीचा हा हल्ला पाहून दुकानदारही दुकाने बंद करून पळाले..

January 27, 2023

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बारामतीचाच शिक्षणातही झेंडा..! विद्या प्रतिष्ठान पुणे विद्यापीठामध्ये ठरले सर्वोत्कृष्ठ महाविद्यालय..!

January 27, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group