पुणे : महान्यूज लाईव्ह
पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडू इच्छिणाऱ्यांनी उद्यापासून १७ तारखेपर्यंत घराबाहेर पडू नये. शासनाने पुढील तीन दिवसासाठी गडकिल्ले आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांवर जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे अशा ठिकाणांवर प्रवेशास बंदी असू शकते. त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे.
याखेरीज पुढील दिवस पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर आणि आंबेगाव या आठ तालुक्यातील शाळाही पुढील तीन दिवस बंद असणार आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि शिरूर या तालुक्यातील शाळा मात्र नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत यासंदर्भातील आदेश काढण्यात आलेले आहेत. या आठ तालुक्यात पुढील तीन दिवसात रेड, ऑरेंज आणि यलो असे अतीवृष्टीचे इशारे देण्यात आलेले आहेत. यामुळेच वरील सूचना देण्यात आलेली आहे.