• Contact us
  • About us
Saturday, February 4, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवारसाहब को गुस्सा क्यू आ गया? मी अनेकदा शपथ घेतल्या.. पण कुठल्याही राज्यपालांनी कधी पेढा भरवला नाही! शपथ चुकीची होत असतानाही दुर्लक्ष करत, राज्यपाल पेढा भरवतात! चला आनंद आहे!

Maha News Live by Maha News Live
July 3, 2022
in सामाजिक, सुरक्षा, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, व्यक्ती विशेष, Featured
0

मुंबई : महान्यूज लाईव्ह

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवेळी चुकीच्या पद्धतीने शपथ घेतली जात असतानाही राज्यपाल कोशियारी यांनी दुर्लक्ष करणे, राज्यपालांनी स्वतःहून मुख्यमंत्र्यांना पेढा भरवणे या साऱ्या गोष्टी सध्याच घडत असल्याबद्दल शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर शरसंधान केले आहे. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्या या नात्यातील हा कडवटपणा शरद पवार यांच्या बोलल्यानंतर अधिकच पुढे आला आहे.

काल शरद पवार यांनी एका मागून एक ट्विट करत राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी ट्विट केले की, मी 1967 पासून शपथ घेतल्या आहेत. 1972 ते 1990 पर्यंत मी सुद्धा शपथा घेतल्या, परंतु कोणत्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही. शपथ चुकीची होत असताना राज्यपालांनी दुर्लक्ष केले आणि पेढा भरवून फुलांचा गुच्छ येताना आपण सर्वांनी पाहिले आहे. चला आनंद आहे, एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला.

मी अमुक अमुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून अशी शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली. ही शपथ कोणी दिली? तर राज्यपालांनी दिली! आमचे सरकार आले, त्यावेळी मी पहिल्या लाईन मध्ये बसलो होतो. आमच्या एका सदस्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरून शपथेला सुरुवात केली, तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली आणि माझ्या नावाचा उल्लेखही केला.

मात्र कालच्या शपथेवेळी श्रीमान राज्यपाल कोशियारी यांनी काहीच हरकत घेतली नाही याची आश्चर्य वाटते. आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव करून पाठवला होता. मुळात मंत्रिमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते. असे असताना देखील जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसेच ठेवला आणि कोणताही निर्णय घेतला नाही.

राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे? याची चर्चा करण्याची गरज नाही. लोकांना हे सर्व ठाऊक आहे. आता बारा आमदारांबाबत राज्यपाल निर्णय घेणार आहेत असे ऐकले आहे. एक गोष्ट स्पष्ट होईल की, एका सरकारने अधिकृतपणे मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन नावे दिली होती, त्यावर अडीच वर्षांमध्ये कोणतीही कारवाई झाली नाही आणि नवं सरकार आल्यानंतर त्यांच्या प्रश्नावर तातडीने कारवाई केली.

असे होत असेल तर जी शपथ आम्ही घेतो की, माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती कुठल्या एका बाजूची आहे, हे न पाहता निरपेक्षपणे निकाल देईल. परंतु आताचे राज्यपाल निरपेक्षपणाची जी व्याख्या देश वाचनसमोर ठेवत आहेत, ते आपण निरपेक्षपणे पाहत आहोत. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक व सभागृहातील बहुमत असेल तर पक्षाचा व्हिप पाळावाच लागतो. तो पाळला गेला नाही तर काय होईल? पक्ष म्हणजे काय? एक विधिमंडळ पक्ष आणि दुसरा पक्ष संघटना! त्यात संघटनेने ज्या दिलेल्या तरतुदीमध्ये अधिकार आहेत, ते घटनेचे चित्र अंतिम आहे.

त्यानुसार पाहिले तर आता असे दिसते की, ते एका बाजूला आहे आणि विधिमंडळाची कमिटी एका बाजूला दिसते. त्यामुळे न्यायालयात काय होईल माहित नाही. अशी शक्यता नाकारता येत नाही की, विधिमंडळ पक्षाची एकंदरीत संख्या पाहता तो दुर्लक्षित करता येत नाही. सभागृहाचे अध्यक्ष निर्णय घेतात ते कसे व कधी घेणार हे माहित नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या मनात काय आहे? त्यावर चित्र स्पष्ट होईल किंवा ते निर्णय सुप्रीम कोर्टात ठरेल.

Next Post

भाजपचे राहुल नार्वेकर यांना 164 मते! विधानसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमताचा आकडा पार! राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खानापूरात अभिषेक चा खून केला आणि गाठले त्यांनी रत्नागिरी.. पण कानून के भी हात लंबे होते है.. फिर गुनहगार ओंकार हो या रहीम!  

February 4, 2023

हरीण मारले तर होतो गुन्हा; पण हरीण वाचवणं हा सुद्धा ठरला त्यांचा गुन्हा! बारामतीवरून दौंडला निघालेल्या दुचाकीला हरीण आडवे गेले आणि हरणाला वाचवताना एकाचा मात्र जीव गेला..!

February 4, 2023

जो जो चीनच्या नादाला लागला.. तो तो कंगाल जाहला..! श्रीलंकेनंतर पाकिस्तानची अवस्था वाईट! एका डॉलरचा दर पोहोचला 271 रुपयांवर!

February 4, 2023
ऐका हो ऐका.. इंदापूरात पीडब्ल्यूडीच्या कामाने प्रवाशीही गहिवरला.. खातं एवढं प्रामाणिक की, रात्री स्पीड ब्रेकर उभा केला.. तिसऱ्या दिवशी त्याचापार भुगा झाला..!

ऐका हो ऐका.. इंदापूरात पीडब्ल्यूडीच्या कामाने प्रवाशीही गहिवरला.. खातं एवढं प्रामाणिक की, रात्री स्पीड ब्रेकर उभा केला.. तिसऱ्या दिवशी त्याचा
पार भुगा झाला..!

February 4, 2023

अभ्या तू फिक्स… असं लिहून त्यांनी अगोदर स्टेटस ठेवले होते.. पूर्वीच्या काळी दरोडा टाकताना सांगून टाकायचे.. आता सांगून गावागावात खून करू लागलेत, मिसरूड न फुटलेली मुलं..

February 4, 2023

टकारी समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचं आश्वासन!

February 3, 2023

पाटसला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन.!

February 3, 2023

शांतताप्रिय खानापूर गावात वीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून! गावगुंडाने का केला खून? गाव चिडले!

February 3, 2023

आता राज्यात प्रत्येक शाळेत आजीआजोबा दिवस साजरा होणार.. विटीदांडूपासून आजीच्या बटव्यापर्यंतचा प्रवास होणार..नातू आजीआजोबांसाठी करणार डान्स..!

February 4, 2023

एकजूट मविआची दिसली.. महाराष्ट्रातील विचित्र राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या भाजपविषयीची सुशिक्षितांच्या मतातून दिसली..!

February 3, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group