मुंबई : महान्यूज लाईव्ह
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीने सरकारच्या ४२ विभागात रिक्त असलेली २,७५,००० पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ४२ शासकीय विभागात तब्बल पावणे तीन लाख पदे रिक्त आहेत. या जागांवर लवकरच भरती निघणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या रिकाम्या असलेल्या पदांमुळे कर्मचाऱ्यांवर मोठा ताण असून कामे पेडींग पडण्याचे काम वाढते आहे.
गृहविभागात ४९ हजार ८५१, सार्वजनिक आरोग्य विभागात २३ हजार ८२२, जलसंपदा विभागात २२ हजार ४८९, महसूल व वन विभागात १३ हजार ५५७, वैद्यकीय शिक्षण विभागात १३ हजार ४३२, सार्वजनिक बांधकाम विभागात ८ हजार १२, आदिवासी विभागात ६ हजार ९०७ तर सामाजिक न्याय विभागात ३ हजार ८२१ पदे शिल्लक आहे.
ही भरती दोन टप्प्यात होणार असल्याचीही माहिती मिळते आहे. याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.