मुंबई : महान्यूज लाईव्ह
दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या महासागरात अडकून पडलेला मान्सून आता तेथून पुढे वाटचाल करत असल्याच्या सुखद बातम्या येत असून आज ( दि. २७ ) रोजी मान्सूनचे थंडगार वारे केरळच्या किनाऱ्यावर धडकणार आहेत.
आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेले पाच दिवस मान्सून अडकून पडला होता. त्यामुळे यावर्षी लवकर पाऊसकाळ सुरु होण्याच्या शक्यता मावळत चालल्या होत्या. आता पुढील ४८ तासात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, कन्याकुमारी, मालदीव आणि लक्षव्दिपपर्यंत पोचेल असे सांगितले जात आहे.
आता महाराष्ट्रात १ जून रोजी मान्सून पोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये ४ दिवसांचा उशीरही होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हणजे आहे.