• Contact us
  • About us
Friday, June 2, 2023
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्ञानाचा अथांग सागर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

tdadmin by tdadmin
April 14, 2022
in संपादकीय, सामाजिक, आरोग्य, कामगार जगत, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
ज्ञानाचा अथांग सागर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लक्ष्मण जगताप, बारामती

महान्यूज लाईव्ह विशेष

‘ जगात स्त्री आणि पुरुष या दोनच जाती असून मानवता हा एकच धर्म आहे.’ असे मानवतावादी विचार मांडणारे जागतिक कीर्तीचे पंडित आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. देशाच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान फार मोठे असल्याने त्यांच्या कार्याला उजाळा देणे एक भारतीय म्हणून सर्वांची जबाबदारी आहे. डॉ.आंबेडकर ,छञपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज , महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस , राजाराम मोहन रॉय , भगतसिंग , राजगुरु, अशा अनेक महान विभूतींनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माझे राष्ट्र या उदात्त भावनेतून राष्ट्राच्या उन्नतीबरोबरच देशातील सर्वसामान्य जनतेसाठी आपले जीवन सर्मपित केले. म्हणून आज स्वातंञ्यानंतर मागे वळून पाहताना या थोर पुरुषांच्या विचारांचा मागोवा घेणे आणि त्यानुसार आपली वाटचाल करणे आपले काम आहे.

डॉ.आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करुन देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या संविधानाचे महत्त्व अधोरेखित करतात.

अज्ञान हे सर्व समस्यांचे मूळ आहे हा अतिशय महत्त्वाचा विचार बाबासाहेब आपल्याला देतात. बाबासाहेब अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या ज्ञानाची भूक भागविली. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही याविषयी बाबासाहेब भाषणात म्हणतात.
” मुंबईच्या डेव्हलपमेंट चाळीत दहा फूट लांब,दहा फूट रुंद अशा खोलीत बाप,भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करु शकलो, तर मग तुम्हास आजच्या साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल ? कोणताही मनुष्य सतत दिर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुध्दीमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.” पुणे येथे ११-३-१९३८ रोजी विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना डॉ.आंबेडकरांनी हे विचार मांडले आहेत .

बाबासाहेबांनी त्या काळी मांडलेले विचार आजही किती मौल्यवान आहेत याची प्रचिती येते. आज मुलांना सर्वसुखसोयी अथवा साधने उपलब्ध आहेत. परंतु शिक्षणात अपेक्षित प्रगती अथवा यश मिळत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे जाणीवेचा अभाव. माझ्या आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी मला शिकलेच पाहिजे, ही जाणीव मुलांमध्ये निर्माण होईल त्यावेळी समाजात अनेक विद्यार्थी आत्मविश्वासाच्या बळावर यशवंत किर्तीवंत झालेले पहावयास मिळतील.

बाबासाहेब पुढे आपल्या भाषणात म्हणतात “आत्मविश्वासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. मी जे करीन ते होईल. अर्थात हे सर्व मी आत्मविश्वासावर अवलंबूनच करत असतो.”

बाबासाहेब विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देतात. शिकण्याशिवाय पर्याय नाही हे समजावून देताना ते सांगतात .’ विद्या हे असं धन आहे की त्याची कोणी चोरी करु शकत नाही ‘.

आजच्या मुलांनी शिक्षण घेत असताना बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. कारण बाबासाहेब इंग्लडमध्ये असताना जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यास आठ वर्षे लागतात तो अभ्यास त्यांनी दोन वर्षे तीन महिन्यात पूर्ण केला. यासाठी चोवीस तासातील एकवीस तास बसून अभ्यास करावा लागला आहे. ज्ञानाची भूक इतकी प्रचंड होती की पोटाच्या भूकेचा त्यांना विसर पडत असे.. जागतिक कीर्तीचे विद्वान पंडित म्हणून त्यांचा लौकिक आहे.

विद्या विनयेन शोभते याबाबतीत बाबासाहेब पुढे म्हणतात ” माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तर विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल.”
शिक्षणतज्ज्ञ म्हणून बाबासाहेबांचे विचार कमालीचे प्रभावशाली आहेत. शिक्षणाने माणसाच्या जीवनातील अंधःकार दूर होवून ज्ञानाचा प्रकाश येऊ शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता.परदेशात जाऊन बाबासाहेबांनी अनेक विद्याशाखांचा अभ्यास केला. विविध विषयावर संशोधन केले.अनेक पदव्या संपादन केल्या. एक वेळ तर अशी होती की बाबासाहेबांना पावाच्या तुकड्यावर दिवस काढावे लागत होते. तरी सुद्धा आपल्या शिक्षणापासून विचलित होण्याचा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही. बाबासाहेब खूप जिद्दी होते. मनात आलेली गोष्ट ते कितीही ञास झाला तरी ते साध्य करत.

बाबासाहेबांना पुस्तकांचे व वाचनाचे प्रचंड वेड होते. पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारा दुसरा माणूस नसेल असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. त्यांच्या ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. ख-या अर्थाने बाबासाहेब श्रीमंत होते. माणसांपेक्षा त्यांना पुस्तकांचा सहवास खूप आवडत असे. आज आपल्याला ज्ञानी बनायचे असेल तर बाबासाहेबांसारखे पुस्तकात गुंतून घ्यावे लागेल. आजच्या काळात ज्ञान हीच संपत्ती असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांने ज्ञानी बनण्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत.

Next Post
पैशांच्या वादातून मित्राचा खून ; दोन तासाच्या आत आरोपी अटक

पैशांच्या वादातून मित्राचा खून ; दोन तासाच्या आत आरोपी अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंदापूर काँग्रेस कमिटीची भव्य इमारत आता इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर..! आता ‘काँग्रेस’ ऐवजी ‘भाजप’ कार्यकर्त्यांची वर्दळ दिसणार..!

June 1, 2023

इंदापुरातली काँग्रेसची उरलीसुरली आठवण मिटली.. होती ती फक्त एक ट्रस्ट, जिच्यावर शिक्कामोर्तब झालं!

June 1, 2023
बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता झाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय! भाजपा कार्यकर्ते गोविंद देवकाते यांच्या पाठपुराव्याला यश!

बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता झाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय! भाजपा कार्यकर्ते गोविंद देवकाते यांच्या पाठपुराव्याला यश!

May 31, 2023

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने दिला जात असलेला पुरस्कार
महिलांना प्रेरणादायी ठरेल! डीवायएसपी बाळासाहेब भालचीम यांचं मत!

May 31, 2023

वाई शहरातील आंबेडकरनगर मध्ये विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू!

May 31, 2023

तर छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा! वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा राष्ट्रवादीला टोला!

May 31, 2023

दोघांनी पार्टी करायचं ठरवलं.. मटण आणलं.. पण मटण वाढण्यात कमीजास्तपणा झाला.. इथेच गफला झाला.. राग आला म्हणून जितू देवाघरी गेला..

May 31, 2023
पणदरे पंचक्रोशी व्हाटसएप ग्रुपवर पोलिसांची कारवाई! सोशल मिडियावर व्यक्त होताना काळजी घेण्याची गरज!

पणदरे पंचक्रोशी व्हाटसएप ग्रुपवर पोलिसांची कारवाई! सोशल मिडियावर व्यक्त होताना काळजी घेण्याची गरज!

May 31, 2023

आता छत्रपती कारखान्याच्या मतदार यादीचं काय होणार? शिंदे- भाजप सरकारने अक्रियाशील सभासदांबाबत असा निर्णय घेतला!

May 31, 2023

मुलीचं डोळ्यासमोर अपहरण केल.. मग आईवडीलांनी रेल्वेखाली जीव दिला.. संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरातच सरण रचलं.. चितेला भडाग्नी दिला..!

May 31, 2023
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group